शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 07:54 IST

पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतलेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. भारताच्या एका पाठोपाठ एक कारवाईमुळे पाकची झोप उडाली आहे त्यामुळेच पाकिस्तानी मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. भारत पुढील २४ ते ३६ तासांत सैन्य हल्ला करू शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्र्याचं हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद विरोधी लढाईत सैन्याला कारवाई करण्याची मुभा दिली आहे जेणेकरून पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. पहलगामच्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री तरार यांनी सोशल मिडिया X वर एक पोस्ट लिहून पाकिस्तानकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.

घाबरलेल्या पाकची पोकळ धमकी

भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केला आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं.

दरम्यान, पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानात हायअलर्ट असून देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कडक शब्दात इशारा दिला होता. आम्ही दहशतवादी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना असा धडा शिकवू ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपले असतील तरी आम्ही शोधून काढू असं मोदींनी इशारा दिला होता. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत