शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 07:54 IST

पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतलेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. भारताच्या एका पाठोपाठ एक कारवाईमुळे पाकची झोप उडाली आहे त्यामुळेच पाकिस्तानी मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. भारत पुढील २४ ते ३६ तासांत सैन्य हल्ला करू शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्र्याचं हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद विरोधी लढाईत सैन्याला कारवाई करण्याची मुभा दिली आहे जेणेकरून पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. पहलगामच्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री तरार यांनी सोशल मिडिया X वर एक पोस्ट लिहून पाकिस्तानकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.

घाबरलेल्या पाकची पोकळ धमकी

भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केला आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं.

दरम्यान, पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानात हायअलर्ट असून देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कडक शब्दात इशारा दिला होता. आम्ही दहशतवादी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना असा धडा शिकवू ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपले असतील तरी आम्ही शोधून काढू असं मोदींनी इशारा दिला होता. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत