शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दोन दिवसांपासून २६० प्रवासी अडकले तुर्कीतल्या विमानतळावर; लंडनहून मुंबईला येत होते विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:26 IST

भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कस्थानमधील विमानतळावर अडकून पडले आहेत.

Turkey Diyarbakir Airport: भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कीमधील विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. लंडनहून मुंबईला येणारे विमान दियारबाकीर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले होते. लंडन हिथ्रो येथून मुंबईला जाणारे आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे. व्हर्जिन अटलांटिकने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यासह सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील २५० हून अधिक प्रवाशांना दोन दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. सर्व प्रवासी तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. २ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणारे VS358 हे विमान आपत्कालीन परिस्थितीमुळे दियारबाकीर विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, लँडिंग केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र त्यानंतर प्रवाशांची मुंबईल्या परतण्याबाबत कोणतीही सुविधा करण्यात आली नव्हती.

विमानातल्या बिघाडानंतर क्रूला हॉटेलमध्ये नेण्यात आले तर प्रवाशांना छोट्या प्रादेशिक विमानतळामधील भागात थांबवण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना दोन दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीनंतर काही प्रवाशांना जवळच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी दुसरे विमान तयार होईल, असे एअरलाइनने सांगितले होते. मात्र काही प्रवासी अजूनही विमानतळ ट्रान्झिट होल्डिंग एरियामध्ये आहेत.

अडकलेल्या प्रवाशांपैकी एकाने पीटीआयला सांगितले की, त्यांना जमिनीवर बसण्यास भाग पाडले गेले. त्यांना ब्लँकेटही देण्यात आले नाही. याशिवाय, शाकाहारी जेवण उपलब्ध नाही, असे एका प्रवाशाने सांगितले. मात्र व्हर्जिन अटलांटिकने सांगितले की, तुर्कीमध्ये प्रवाशांना रात्रीसाठी हॉटेल आणि अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. २७५ प्रवाशांमध्ये एक शौचालय आहे. त्यांच्याकडे अडॅप्टर नसल्याने फोनची बॅटरी संपत आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेहाचे रुग्ण आणि वृद्धांना हा त्रास सहन करावा लागतोय, असेही एका प्रवाशाने सांगितले.

दरम्यान, तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर सक्रिय भूमिका घेतली आहे. भारतीय दूतावासाने एअरलाइन, दियारबाकीर विमानतळ संचालक आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. दूतावासाने या प्रकरणावर एक निवेदन जारी करुन प्रवाशांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. ही समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी पर्यायी विमान व्यवस्था करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असेही दूतावासाने म्हटलं. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ