शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

बांगलादेशात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत 105 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 15:25 IST

हे मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे.

ढाका- अंमली पदार्थांविरोधात बांगलादेशने हाती घेतलेल्या कारवाईत आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी आणि तपास संस्थांनी गेल्या पंधरावडाभरात ही कारवाई हाती घेतली आहे. संपुर्ण देशभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.हे 105 लोक अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे आहेत असे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील गुन्हे अन्वेषण विभाग, शीघ्रकृतीदल तसेच पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र या लोकांच्या मृत्यूवर मानवाधिकार संघटना आणि विविध देशांच्या राजनयिकांनी आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हत्या म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्ज आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.काल रात्री शीघ्रकृती दल आणि पोलिसांच्या कारवाईत 12 लोकांचे प्राण गेले आहेत.  बांगलादेशाच्या पंतप्रधान 15 मे रोजी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात देशव्यापी कारवाई करणारी मोहीम हाती घेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र या मोहिमेत मृत्युमुखी पडलेले लोक रस्त्याच्या कडेला खड्ड्यांमध्ये सापडले आहेत. अंमली पदार्थांची कथित तस्करी करणारे हे लोक आमच्या कारवाईत मृत्युमुखी पडले नसून ते त्यांच्या अंतर्गत भांडणांमुळेच मेले आहेत अशी सुरक्षा दलांनी भूमिका घेतली आहे.अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम थांबणार नसल्याची माहिती बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले. बांगलादेशामध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत नाही मात्र पण गेली काही वर्षे याबा नावाच्या अंमली पदार्थाचे चे केंद्र झाले आहे. याबा या पदार्थाला हॉर्स ड्रग असेही म्हणतात. हा अंमली पदार्थ प्रामुख्याने शेजारच्या म्यानमारमधून बांगलादेशात येतो. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशDrugsअमली पदार्थPoliceपोलिस