शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:19 IST

Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली.

Bilawal Bhutto on Pahalgam Terrorist Attack: दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पहिला प्रहार केला तो सिंधू नदीचे पाणी रोखून! सिंधू जल करार बाजूला ठेवून भारताने पाणी रोखल्याने पाकिस्तानात थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानातील मंत्री आणि नेते भारताला धडा शिकवण्याची मुक्ताफळे उधळत आहेत. त्यात आता माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तोंनी सिंधू नदीतून पाणी वाहिले नाही, तर भारताचे रक्त वाहणार, अशी धमकी दिली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो एका कार्यक्रमात बोलताना भारताबद्दल गरळ ओकताना दिसत आहे. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहणार असे म्हणत आहेत. सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सखरमध्ये त्यांनी एका रॅलीत हे विधान केले. 

बिलावल भुत्तो काय बोलले?

सखरमध्ये झालेल्या सभेत बिलावल भुत्तोंनी भारताविरोधात थयथयाट केला. ते म्हणाले, "जी घटना काश्मीरमध्ये झाली आणि भारताने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत."

वाचा >>"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं पहलगाम हल्ल्यावरून प्रसारमाध्यमांना फटकारलं

"या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी घोषणा केली आहे. हा त्यांचा एकांगी निर्णय आहे की, जो सिंधू जल करार आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला; ज्या माध्यमातून भारताने हे मान्य केलेलं आहे की, सिंधू पाकिस्तानची आहे", असे भुत्तो म्हणाले. 

सिंधू नदीतून पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त -भुत्तो

"मोदींनी आणि त्यांच्या सरकारने घोषणा केली की, आता कोणताही करार मानणार नाही. आणि मी सखलमध्ये, याच सिंधू नदीच्या काठावरून भारताला सांगू इच्छितो की, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार. एकतर या नदीतून आमचे पाणी वाहणार नाही, तर त्यांचे रक्त वाहणार", अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तोंनी उधळली. 

"असे होऊ शकत नाही की, एक दिवस उठतील आणि निर्णय घेतील की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही', असेही भुत्तो म्हणाले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकार