शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:32 IST

पोलिसांचे सहाय्य : सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांना सोशल मिडीयावरून समजली बातमी

बीड : नुकत्याच झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झाल्यानंतर आपल्या वेदना मांडताना बीड तालुक्यातील उखंडा येथील पार्वती मारोती कदम यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्याच शब्दात लोकमतने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत भारतीय असलेले परंतु सध्या हाँगकाँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी बीड पोलिसांमार्फत कदम कुटुंबाला ५० हजार रूपयांची मदत केली आहे. त्यांना ही बातमी सोशल मिडीयावरून समजली होती.

अवकाळी आणि कुठे मुसळधार तर कुठे अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकºयांच्या शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ५१४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. दरम्यान लोकमतने थेट बांधावर जात पीडित शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. बीड शहरापासून १८ - २० किलोमीटर अंतरावर उखंडा- पिठ्ठी येथील कदम कुटुंबातील पार्वती आणि मारोती हे दाम्पत्य हताश दिसून आले. पावसाने भिजलेली बाजरीची कणसे घरासमोर आणि रस्त्यालगत वाळण्यास घातली होती. या रस्त्याने प्रवास करताना ही बाब लोकमत प्रतिनिधी व छायाचित्रकाराच्या निदर्शनास आली तोच दुचाकी थांबवून पार्वती कदम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना, रानात पसाभरही आलं नाही. लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरण येत नाय’ अशी कैफियत पार्वती कदम यांनी मांडली होती. या संदर्भात १७ नोव्हेंबरच्या अंकात लोकमतने ‘असं वाटतं मरु तर बरं, पण मी मरायची नाय..’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. लोकमत आॅनलाईनद्वारे लिंक शेअर केली होती. सोशल मिडीयावरही दिवसभर ही बातमी वाचणारे आपल्या संबंधित मित्रांच्या ग्रुपवर पोस्ट करत होते. बातमीला लाईक करतानाच दातृत्वाचा भाव जागा होत होता. वाचताना मन हेलावल्याचे राज्यातील अनेक वाचकांनी बीड कार्यालयात प्रस्तुत प्रतिनिधीशी फोनद्वारे संपर्क करुन सांगतानाचा मदतीची भावना व्यक्त केली. तर सोशल मिडियावर ही बातमी वाचून सध्या हॉँगकॉँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी त्यांच्या परिचितांशी संपर्क करत बीड पोलिसांमार्फत पार्वती मारोती कदम यांच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत केली.  पाटील हे भारतीय रहिवासी असून ६ महिन्यांपासून हॉँगकॉगमध्ये ते राहतात. 

लोकमतच्या बातमीची दखल घेऊन कदम दाम्पत्याला ५० हजारांची मदत

दरम्यान ठाणे येथील स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम, उमरग्याचे विनायक पाटील, बारामतीचे अ‍ॅड. नितीन भामे यांच्यासह अनेकांनी मानवतेच्या दृष्टीतून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीdroughtदुष्काळMumbaiमुंबईfarmer suicideशेतकरी आत्महत्या