शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारताने आमचे तळ उद्ध्वस्त केले; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची जाहीर कबुली, ऑपरेशन सिंदूरचा धसका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:29 IST

ऑपरेशन सिंदुरमध्ये प्रचंड नुकसान झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द लष्कर-ए-तोयबाच्या एका बड्या नेत्याने दिली आहे.

Operation Sindoor: भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनेपाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला मोठा तडाखा दिला. या लष्करी कारवाईत पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द लष्कर-ए-तोयबाच्या एका बड्या नेत्याने दिली आहे. भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य करून मोठी चूक केल्याची धमकी देत दहशतवादी नेत्याने आता भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.

हाफिज सईदचा अत्यंत जवळचा मानला जाणारा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरी याने एका जाहीर सभेत भारताच्या कारवाईची कबुली दिली. "भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करून मोठी चूक केली आहे," असे म्हणत त्याने स्वतःच्याच पायाभूत सुविधा नष्ट झाल्याचे मान्य केले. हजारो समर्थकांसमोर बोलताना त्याने काश्मीर मिशनवरून मागे न हटण्याची दर्पोक्ती केली असून जगाला हादरवून सोडण्याची धमकी दिली आहे.

कसूरीने आपल्या भाषणात केवळ काश्मीरच नव्हे, तर अमृतसर, होशियारपूर, गुरुदासपूर, जुनागड, हैदराबाद आणि बंगाल हे भागही पाकिस्तानकडून हिरावून घेतल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. कट्टरतावाद्यांना भडकवण्यासाठी त्याने या ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या मुद्द्यांचा आधार घेत भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. "पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून माझे नाव आता जगभर गाजत आहे," असे म्हणत त्याने आपल्या गुन्ह्यांचे जाहीरपणे समर्थन केले.

'ऑपरेशन सिंदूर'चा थरार

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ ते १० मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी कॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. यापैकी ७ तळांवर भारतीय भूदलाने, तर २ तळांवर हवाई दलाने अचूक प्रहार केला. नियंत्रण रेषेवर डझनभर दहशतवादी लाँच पॅड्स उद्ध्वस्त करून घुसखोरीचे मार्ग बंद केले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण तो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीरीत्या मोडून काढला. त्यानंतर १० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी मोहीम महासंचालकांनी भारताशी संपर्क साधून युद्धविराम आणि लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली.

भारताची भूमिका स्पष्ट

भारताने जागतिक स्तरावर स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर ही केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी केलेली एक प्रिसिजन ॲक्शन होती. ही कारवाई कोणत्याही नागरिक किंवा सरकारी मालमत्तेविरुद्ध नव्हती, तर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध होती. या कारवाईमुळे पाकिस्तानचे दहशतवादी जाळे पूर्णपणे विस्कळीत झाले असून, सैफुल्ला कसूरीसारख्या नेत्यांचा थयथयाट भारताच्या लष्करी यशाची पावती मानली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Operation Sindoor Rattles LeT: Commander Admits Base Destruction

Web Summary : Lashkar-e-Taiba commander Saifullah Kasuri admitted India's Operation Sindoor destroyed their bases. He threatened retaliation while acknowledging the operation's impact. India clarified it targeted terrorist infrastructure, disrupting Pakistani networks after the Pahalgam attack response.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान