शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:51 IST

बांगलादेशच्या सरकारने भारतात शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक असल्याचा दावा केला आहे.

Bangladesh Government: बांगलादेशात सत्ता पालटल्यापासून भारतासोबत तिथले संबंध तणावाचे बनले आहेत. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे भारताकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. बांगलादेशातल्या हिंसाचारनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता बांग्लादेश सरकारने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शेख हसीना यांच्या पक्षातील एक लाख लोक भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.

बांगलादेशचे अंतरिम सरकारने आता भारतासोबतच्या संबंधात विष कालवण्यास प्रयत्न करत आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरील विधानानंतर वाद सुरु असताना आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या माहिती सल्लागाराने मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे एक लाख सदस्य भारतात असल्याचा दावा माहिती सल्लागार महफूज आलम यांनी केला.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी मंगळवारी हा धक्कादायक दावा केला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेल्याचे महफुज आलम यांनी म्हटलं. महफुज आलम यांच्या या विधानाने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरु असताना महफुज आलम यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

ढाका येथे ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात महफुज आलम यांनी हे विधान केले. शेख हसीना यांच्या कार्यकाळात कथितपणे बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते. ढाका शहरातील तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. "शेख हसीना यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने लोकाना बेपत्ता करण्याची आणि खून करण्याची पद्धत अवलंबली. भारताने त्यांना आणि त्यांच्या दहशतवादी शक्तींना आश्रय देण्याचे निवडले हे दुर्दैव आहे. आम्हाला कळले आहे की सुमारे १,००,००० अवामी लीग सदस्यांनी तिथे आश्रय घेतला आहे," असं महफुज आलम म्हणाले.

निवडणुकीच्या वेळी लोक गायब झाले

"२०१३ आणि २०१४ मध्ये लोक मतदानाच्या हक्कासाठी लढत असताना बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. या कृतींमागील मुख्य उद्देश निवडणूक व्यवस्थेची तोडफोड करणे हा होता. आता आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, बेपत्ता होण्याच्या प्रकरणात गुंतलेल्या अनेक लोकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इतर अनेकांविरुद्ध तपास अजूनही सुरू आहे," असेही महफुज आलम यांनी म्हटलं.

अवामी लीगच्या लोकांना परत येऊ देणार नाही

"अवामी लीगचा राजकीय विरोध करणाऱ्यांना जबरदस्तीने गायब करण्यापूर्वी दहशतवादी आणि अतिरेकी म्हटलं गेले. त्यांच्या कुटुंबीयांनाही भीती आणि धमक्यांचा सामना करावा लागला. देशाच्या तपास यंत्रणांचा वापर लोकांना गायब करण्यासाठी केला. हसीना अजूनही भारतात राहून देशाविरुद्ध कट रचत आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. अवामी लीगला बांगलादेशात परत येण्याची संधी कधीही दिली जाणार नाही," असं महफुज आलम म्हणाले.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत