शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:51 IST

बांगलादेशच्या सरकारने भारतात शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक असल्याचा दावा केला आहे.

Bangladesh Government: बांगलादेशात सत्ता पालटल्यापासून भारतासोबत तिथले संबंध तणावाचे बनले आहेत. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे भारताकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. बांगलादेशातल्या हिंसाचारनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता बांग्लादेश सरकारने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शेख हसीना यांच्या पक्षातील एक लाख लोक भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.

बांगलादेशचे अंतरिम सरकारने आता भारतासोबतच्या संबंधात विष कालवण्यास प्रयत्न करत आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरील विधानानंतर वाद सुरु असताना आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या माहिती सल्लागाराने मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे एक लाख सदस्य भारतात असल्याचा दावा माहिती सल्लागार महफूज आलम यांनी केला.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी मंगळवारी हा धक्कादायक दावा केला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेल्याचे महफुज आलम यांनी म्हटलं. महफुज आलम यांच्या या विधानाने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरु असताना महफुज आलम यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

ढाका येथे ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात महफुज आलम यांनी हे विधान केले. शेख हसीना यांच्या कार्यकाळात कथितपणे बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते. ढाका शहरातील तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. "शेख हसीना यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने लोकाना बेपत्ता करण्याची आणि खून करण्याची पद्धत अवलंबली. भारताने त्यांना आणि त्यांच्या दहशतवादी शक्तींना आश्रय देण्याचे निवडले हे दुर्दैव आहे. आम्हाला कळले आहे की सुमारे १,००,००० अवामी लीग सदस्यांनी तिथे आश्रय घेतला आहे," असं महफुज आलम म्हणाले.

निवडणुकीच्या वेळी लोक गायब झाले

"२०१३ आणि २०१४ मध्ये लोक मतदानाच्या हक्कासाठी लढत असताना बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. या कृतींमागील मुख्य उद्देश निवडणूक व्यवस्थेची तोडफोड करणे हा होता. आता आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, बेपत्ता होण्याच्या प्रकरणात गुंतलेल्या अनेक लोकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इतर अनेकांविरुद्ध तपास अजूनही सुरू आहे," असेही महफुज आलम यांनी म्हटलं.

अवामी लीगच्या लोकांना परत येऊ देणार नाही

"अवामी लीगचा राजकीय विरोध करणाऱ्यांना जबरदस्तीने गायब करण्यापूर्वी दहशतवादी आणि अतिरेकी म्हटलं गेले. त्यांच्या कुटुंबीयांनाही भीती आणि धमक्यांचा सामना करावा लागला. देशाच्या तपास यंत्रणांचा वापर लोकांना गायब करण्यासाठी केला. हसीना अजूनही भारतात राहून देशाविरुद्ध कट रचत आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. अवामी लीगला बांगलादेशात परत येण्याची संधी कधीही दिली जाणार नाही," असं महफुज आलम म्हणाले.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत