शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

७ पैकी एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती, हवामान संकटामुळे थांबले, कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:48 IST

Education: पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.

 नवी दिल्ली - पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ७ पैकी एका मुलाचे शिक्षण हवामान संकटामुळे थांबले असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. हवामान बदलांमुळे आलेल्या आपत्तींचा आशिया, आफ्रिका खंडातील गरीब देशांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला. 

भारत झाला अत्यंत संवेदनशील देशभारत हा हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील देश आहे. २०२१ च्या युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार, भारत १६३ देशांत २६ व्या स्थानावर आहे.पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ यांसारख्या जलद उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे शाळांचे वारंवार नुकसान होत आहे, तर प्रचंड उष्णता आणि वायुप्रदूषण यांसारखे पर्यावरणीय ताण मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवत असून, मुलांच्या शालेय उपस्थिती तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणत आहेत. 

११.८ कोटी मुलांना आले शिक्षणात अडथळेदक्षिण युरोप, आशिया, आफ्रिकेत पूर, चक्रीवादळे होतात. मात्र, तिथे गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. एप्रिलमध्ये प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींमुळे ११.८ कोटी मुलांच्या शालेय शिक्षणात अडथळे आले. आशियात उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. 

१२.३ कोटी विद्यार्थ्यांवर कोणत्या महिन्यात कोणते संकट आले? जानेवारी वादळफेब्रुवारी पूरमार्च पूरएप्रिल उष्णतेची लाटमे उष्णतेची लाटजून उष्णतेची लाटजुलै उष्णतेची लाटऑगस्ट चक्रीवादळसप्टेंबर चक्रीवादळऑक्टोबर चक्रीवादळनोव्हेंबर वादळडिसेंबर चक्रीवादळ

२४.२ कोटीफटका बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी हे कमी आणि निम्न-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत.१७.१ कोटीविद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा हा शालेय शिक्षणात व्यत्यय आणणारा सर्वांत मोठा हवामान धोका ठरला.११ कोटीमुलांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका एप्रिलमध्ये बसला. यात बांगलादेश, कंबोडिया, भारत, फिलिपिन्स आणि थायलंडमधील मुलांचा समावेश आहे.

८५ देश किंवा प्रदेशांमध्ये शाळा हवामानाशी संबंधित धोक्यांमुळे प्रभावित झाल्या, तर २३ देशांना अनेक वेळा शाळा बंद कराव्या लागल्या.१८ देशांना सप्टेंबर महिन्यात हवामानाशी संबंधित बदलांमुळे शाळा सुरू करण्यात मोठा फटका बसला. यागी वादळामुळे पूर्व आशियात फटका बसला.

हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांमुळे लोकांना गंभीर संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून शाळेत जाणारे विद्यार्थीही सुटलेले नाहीत. ते शाळेत जाऊ शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. - कॅथरीन रसेल,  कार्यकारी संचालक, युनिसेफ.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी