शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

७ पैकी एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती, हवामान संकटामुळे थांबले, कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:48 IST

Education: पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.

 नवी दिल्ली - पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ७ पैकी एका मुलाचे शिक्षण हवामान संकटामुळे थांबले असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. हवामान बदलांमुळे आलेल्या आपत्तींचा आशिया, आफ्रिका खंडातील गरीब देशांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला. 

भारत झाला अत्यंत संवेदनशील देशभारत हा हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील देश आहे. २०२१ च्या युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार, भारत १६३ देशांत २६ व्या स्थानावर आहे.पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ यांसारख्या जलद उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे शाळांचे वारंवार नुकसान होत आहे, तर प्रचंड उष्णता आणि वायुप्रदूषण यांसारखे पर्यावरणीय ताण मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवत असून, मुलांच्या शालेय उपस्थिती तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणत आहेत. 

११.८ कोटी मुलांना आले शिक्षणात अडथळेदक्षिण युरोप, आशिया, आफ्रिकेत पूर, चक्रीवादळे होतात. मात्र, तिथे गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. एप्रिलमध्ये प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींमुळे ११.८ कोटी मुलांच्या शालेय शिक्षणात अडथळे आले. आशियात उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. 

१२.३ कोटी विद्यार्थ्यांवर कोणत्या महिन्यात कोणते संकट आले? जानेवारी वादळफेब्रुवारी पूरमार्च पूरएप्रिल उष्णतेची लाटमे उष्णतेची लाटजून उष्णतेची लाटजुलै उष्णतेची लाटऑगस्ट चक्रीवादळसप्टेंबर चक्रीवादळऑक्टोबर चक्रीवादळनोव्हेंबर वादळडिसेंबर चक्रीवादळ

२४.२ कोटीफटका बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी हे कमी आणि निम्न-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत.१७.१ कोटीविद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा हा शालेय शिक्षणात व्यत्यय आणणारा सर्वांत मोठा हवामान धोका ठरला.११ कोटीमुलांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका एप्रिलमध्ये बसला. यात बांगलादेश, कंबोडिया, भारत, फिलिपिन्स आणि थायलंडमधील मुलांचा समावेश आहे.

८५ देश किंवा प्रदेशांमध्ये शाळा हवामानाशी संबंधित धोक्यांमुळे प्रभावित झाल्या, तर २३ देशांना अनेक वेळा शाळा बंद कराव्या लागल्या.१८ देशांना सप्टेंबर महिन्यात हवामानाशी संबंधित बदलांमुळे शाळा सुरू करण्यात मोठा फटका बसला. यागी वादळामुळे पूर्व आशियात फटका बसला.

हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांमुळे लोकांना गंभीर संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून शाळेत जाणारे विद्यार्थीही सुटलेले नाहीत. ते शाळेत जाऊ शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. - कॅथरीन रसेल,  कार्यकारी संचालक, युनिसेफ.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी