शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Omicron: कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:53 IST

कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे

नवी दिल्ली – जगातील सर्वच देश सध्या कोविड १९(Covid 19) च्या सर्वात खतरनाक ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटशी लढा देत आहेत. त्यातच जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखी नवे व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. याचा अर्थ असा की कोरोनाच्या ओमायक्रॉननंतर नव्या व्हेरिएंटचा प्रार्दुभाव होण्याचा धोका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अदनोम गेब्रेयेसस यांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे जगात ८ कोटींहून अधिक रुग्ण आढळून आलेत. जे २०२० च्या महामारीपेक्षा अधिक आहेत. सध्या महामारीची परिस्थिती पाहता ओमायक्रॉन हा अखेरचा व्हेरिएंट नाही. परंतु कोविड १९ महामारीची तीव्रता यावर्षाच्या अखेर पर्यंत समाप्त केली जाऊ शकते असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु त्यासाठी सर्व देशांनी व्यापक रणनीती आणि पर्यायांचा वापर करायला हवं असं WHO नं सांगितले.

कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कमीत कमी देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करायला हवं. देशात कोविड १९ टेस्टिंगला चालना देणे, भविष्यातील व्हेरिएंटचा शोध घेणे आणि महामारी संबंधित सर्व समस्यांवर समाधान शोधणं गरजेचे आहे. केवळ संकट संपण्याची वाट पाहू नये अशी सूचना WHO ने केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेचे प्रमुख पत्रकार परिषदेत म्हणतात की, कोविड १९ महामारी आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. आपण सध्या नाजूक स्थितीत आहोत. आपल्याला ही महामारी नष्ट करण्यासाठी एकत्र येत काम करायला हवं. दहशतीच सावट ठेवून या महामारीला वाढण्यासाठी मदत करु शकत नाही.

पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल– IIT रिपोर्ट

 कोरोनाची तिसरी लाट पुढील दोन आठवड्यांत टोक गाठेल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा दर म्हणजेच आर व्हॅल्यू १४ ते २१ जानेवारीदरम्यान १.५७ होता. म्हणजेच दोन व्यक्तींच्या माध्यमातून तीन जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा दर येत्या काही दिवसांत आणखी खाली जाईल, असं IIT मद्रासचा रिपोर्ट सांगतो. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना कोरोना बाधित करू शकते, त्या दराला आर व्हॅल्यू म्हटलं जातं. हा दर १ च्या खाली गेल्यास महामारीची स्थिती संपल्याचं समजतात.

आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, १४ ते २१ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ होती. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू २.२ आणि त्याआधी १ ते ६ जानेवारी दरम्यान २.९ होती. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत कोरोना प्रादुर्भावाचा दर कमी होताना दिसत आहे. पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल असा अंदाज आयआयटी मद्रासकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना