शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

By admin | Published: September 28, 2015 2:58 AM

आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे

सिलिकॉन व्हॅली (अमेरिका) : आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था आठ हजार अब्ज डॉलरची आहे आणि आम्हाला ती २० हजार अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आहे. त्याकरिता आम्हाला कृषी, सेवा आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया फेसबुक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लाईव्ह चॅट’ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश असे की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारताकडे पाहण्याचा विश्वाचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. प्रशासनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे पारदर्शकता, उपयुक्ततता आणि सहजपणे लोकांची कामे करता आली पाहिजे. त्याकरिता निधीची कमतरता नाही, कारण की अनेक देशांकडे अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे. त्यांनी या निधीची भारतात गुंतवणूक करावी, असे मोदी यांनी आवाहन केले.मेक इन इंडियाबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले की, भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये परिवर्तन येण्याकरिता वेळ लागत असतो. ४० वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या माध्यमातून देशातील गरिबांना आर्थिक सोर्इंचा लाभ मिळावा, असा उद्देश होता. मात्र त्यानंतरही ६० टक्के लोकांकडे बँक खाते नव्हते. परंतु आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांमध्ये १४ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली. मेक इन इंडियाचे यश हे प्रत्येक व्यक्ती स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छितो. जर हे काम भारतात कमी खर्चात होत असेल तर जगातील लोक तिकडे जातील. आमच्याकडे कुशल कारागीर आणि कच्चा माल आहे. हीच मेक इन इंडियाच्या यशाची हमी आहे.मोदी म्हणाले की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारतात अमेरिकतेतून ८७ टक्के एफडीआय वाढ झाली आहे. तसेच संस्थागत गुंतवणुकीतदेखील ४० टक्के वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये घसरण सुरू असताना भारतात ही स्थिती निर्माण झाली आहे. मेक इन इंडियाच्या यशस्वीतेकरिता आमच्याकडे तरुणांची शक्ती, सशक्त लोकशाही आणि मोठी ग्राहक संख्या आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.ते म्हणाले की, जेव्हा मी इंटरनेट सोशल मीडियाशी जोडल्या गेलो, त्यावेळी त्याच्या शक्तीबाबत अंदाज नव्हता. सत्तेवर आल्यानंतर सोशल मीडियामुळे कामे सहज शक्य होऊ लागली. सोशल मीडियाचे वैशिष्ट्य असे की, तुम्ही ज्या प्रकारचे आहात, त्याप्रमाणे तुमचा सोशल मीडिया स्वीकार करीत असतो. त्याकरिता तुम्हाला स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज नाही. सोशल मीडिया आजच्या घटकेला लोकशाहीचे सामर्थ्य बनला आहे. पूर्वी ज्या कामाकरिता अनेक दिवस लागत असत, ती कामे आता सेकंदामध्ये होऊ लागली आहेत.मोदी पुढे म्हणाले की, सोशल मीडियाने प्रशासनातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.