शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:03 IST

Bangladesh : नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार झाले आहेत.

Dr. Mohammed Yunus : बांगलादेशमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर हसीना यांनी देश सोडला आणि ढाकाहून आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आहेत. बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम पंतप्रधानपदाची शर्यत अधिक तीव्र झाली आहे. या शर्यतीत नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनूस यांचे नाव आघाडीवर आहे.

डॉ मोहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार असणार आहे. विद्यार्थी चळवळीच्या प्रमुख संयोजकांनी रविवारी नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांचे नाव अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून प्रस्तावित केले होते. विद्यार्थी आंदोलनाच्या मुख्य संयोजकांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लामने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिली होती. 

विद्यार्थी चळवळीचे प्रमुख नाहीद इस्लाम यांनी मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. देशाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनीही याला संमती दिली आहे. तसेच खालिद झिया यांचा मुलगा तारिक रहमान हेही अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटलं जात आहे. ज्येष्ठ वकील सारा हुसेन, निवृत्त थ्री स्टार जनरल जहांगीर आलम चौधरी आणि बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सालेहुद्दीन अहमद हेही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत मोहम्मद युनूस?

२८ जून १९४० रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.

भारतावर केली होती टीका

सरकार कोसळण्याच्या आदल्याच दिवशी मोहम्मद युनूस यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आंदोलनाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक् केली. भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. "ही देशांतर्गत बाब असल्याचे भारत म्हणतो तेव्हा मला वाईट वाटते. तुमच्या भावाच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही त्याला घरगुती बाबीबद्दल कसे सांगाल? अनेक गोष्टी मुत्सद्देगिरीत येतात आणि हा त्यांचा देशांतर्गत मुद्दा आहे असे म्हणता येणार नाही. बांगलादेशातील अशांतता शेजारील देशांमध्येही पसरू शकते," असे मोहम्मद युनूस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश