शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:03 IST

Bangladesh : नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार झाले आहेत.

Dr. Mohammed Yunus : बांगलादेशमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर हसीना यांनी देश सोडला आणि ढाकाहून आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आहेत. बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम पंतप्रधानपदाची शर्यत अधिक तीव्र झाली आहे. या शर्यतीत नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनूस यांचे नाव आघाडीवर आहे.

डॉ मोहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार असणार आहे. विद्यार्थी चळवळीच्या प्रमुख संयोजकांनी रविवारी नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांचे नाव अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून प्रस्तावित केले होते. विद्यार्थी आंदोलनाच्या मुख्य संयोजकांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लामने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिली होती. 

विद्यार्थी चळवळीचे प्रमुख नाहीद इस्लाम यांनी मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. देशाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनीही याला संमती दिली आहे. तसेच खालिद झिया यांचा मुलगा तारिक रहमान हेही अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटलं जात आहे. ज्येष्ठ वकील सारा हुसेन, निवृत्त थ्री स्टार जनरल जहांगीर आलम चौधरी आणि बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सालेहुद्दीन अहमद हेही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत मोहम्मद युनूस?

२८ जून १९४० रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.

भारतावर केली होती टीका

सरकार कोसळण्याच्या आदल्याच दिवशी मोहम्मद युनूस यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आंदोलनाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक् केली. भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. "ही देशांतर्गत बाब असल्याचे भारत म्हणतो तेव्हा मला वाईट वाटते. तुमच्या भावाच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही त्याला घरगुती बाबीबद्दल कसे सांगाल? अनेक गोष्टी मुत्सद्देगिरीत येतात आणि हा त्यांचा देशांतर्गत मुद्दा आहे असे म्हणता येणार नाही. बांगलादेशातील अशांतता शेजारील देशांमध्येही पसरू शकते," असे मोहम्मद युनूस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश