शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 06:48 IST

Nigeria Water Crisis: नायजेरिया हा आफ्रिकेतला एक देश, संघर्ष आणि अस्वस्थता कायमच या देशाच्या नशिबी पुजलेली.

नायजेरिया हा आफ्रिकेतला एक देश, संघर्ष आणि अस्वस्थता कायमच या देशाच्या नशिबी पुजलेली. याच देशाच्या उत्तर-मध्य भागातील बेन्यू राज्यातील येलेवाटा गावाचा परिसर. तीन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. काही बंदूकधारी आले. त्यांनी गावाला वेढा घातला. घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यांना घरातच कोंडून घातलं आणि त्यांच्या घरांना बाहेरून आग लावून दिली. जे लोक बाहेर होते, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात शंभरापेक्षा अधिक नागरिक ठार झाले. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. बऱ्याच मृतदेहांची इतकी विटंबना झाली आहे की ते ओळखूही येण्याच्या पलीकडे आहेत. अनेक जण तर अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचं काय झालं हे अजून कोणालाच कळलेलं नाही. चित्रपटात शोभेल अशी ही घटना आणि इतकं भयानक क्रौर्य!

ह्यूमन राइट्स ग्रुप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं यासंदर्भात तीव्र खेद आणि चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे, मरण इतकं स्वस्त झालं आहे का, की कोणीही उठावं, कोणालाही मारावं आणि त्यासंदर्भात कोणालाच काही करता येऊ नये? असे प्रकार आता बंद व्हायला हवेत आणि त्या-त्या देशाच्या सरकारांनी याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. कशामुळे झाल्यात या हत्या? काय होतं त्याचं कारण? अतिरेक्यांनी या हत्या घडवून आणल्या का? या प्रश्नाचं उत्तर त्याहीपेक्षा भयानक आहे. इतक्या लोकांना का ठार मारण्यात आलं, याचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी पाणी आणि जमीन हे त्याचं मुख्य कारण आहे. आपल्या वाट्याचं पाणी आणि जमीन कोणी बळकावू नये; तसंच जर कोणी बळकावत असेल तर त्याचा लगेच नायनाट केला पाहिजे, ही तेथील लोकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे आपल्या वाटेत जो कोणी येईल त्याला संपवायचं हेच धोरण. त्या जोडीला जातीय आणि धार्मिक अस्मिता. या कारणांमुळे हा संघर्ष आणखीच टोकदार झाला आहे आणि माणसं एकमेकांच्या जिवावर उठली आहेत.

या संघर्षात आहेत मुख्यतः दोन गट. एक गट आहे गुराखी/मेंढपाळांचा, तर दुसरा गट आहे शेतकऱ्यांचा. गुराख्यांना आपल्या गुराढोरांना चारण्यासाठी जमिनीची, गवताची आवश्यकता, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी. शेतकऱ्यांचा आरोप आहे की हे गुराखी त्यांची गुरंढोरं आमच्या शेतात चरण्यासाठी सोडून देतात आणि आमच्या शेतीचं नुकसान करतात, तर गुराख्यांचं म्हणणं आहे, या सगळ्याच जमिनी चराऊ आहेत आणि त्यावर आमचाच हक्क आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी १९६५ मध्ये पहिला कायदा लागू झाल्यानंतर या जमिनी आम्हाला मिळाल्या होत्या. तिथल्या पाण्यावरही आमचाच हक्क आहे, म्हणून दोन्ही गटांत गेल्या काही वर्षापासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे.

गेल्याच महिन्यात ग्वेर वेस्ट जिल्ह्यात संशयित गुराख्यांनी ४२ लोकांना गोळ्या घालून ठार केलं. त्याआधी एप्रिल महिन्यात किमान ४० लोकांना अतिशय क्रूर पद्धतीनं कंठस्नान घालण्यात आलं. याच परिसरात २०१९पासून आतापर्यंत पाचशे लोकांना ठार करण्यात आलं आहे. गेल्या फक्त दोन वर्षात नायजेरियात १० हजारपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सततच्या संघर्षामुळे आतापर्यंत सुमारे २२ लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे.

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाWaterपाणीInternationalआंतरराष्ट्रीय