शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चिन्मय दास यांची बाजू मांडणाऱ्यांना हिंदू वकिलांना धमक्या; कोर्टात कुणीच न आल्याने महिन्याभराने सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:27 IST

चिन्मय दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आलेला नसल्याने त्यांना महिनाभर तुरुंगात रहावे लागणार आहे.

Chinmoy Krishna Das : बांगलादेशातील कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलेल्या चिन्मय दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आलेला नाही. त्यामुळे चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना एक महिना तुरुंगात घालवावा लागणार आहे. याआधी चिन्मय दास यांच्या आधीच्या वकिलाच्या घरी झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चिन्मय दास यांचे वकील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.

बांगलादेश सरकारने चिन्मय कृष्णा दास यांच्या जामीन अर्जाप्रकरणी न्यायालयाकडे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र सरकारने वेळ मागितल्याने पुढील सुनावणीची २ जानेवारी रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान अनेक वकिलांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. सुनावणीआधीच चिन्मय दास यांचा खटला लढणाऱ्या वकिलावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र, बांगलादेश सरकारने अद्याप या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेपासून हे निदर्शने करण्यात येत आहेत.

बार असोसिएशनच्या वकिलांनी कोणत्याही कायदेशीर व्यावसायिकाला चिन्मय दास यांचा खटला लढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कोणताही वकील चिन्मय दास यांच्या बाजूने न्यायालयात उभा राहिला नाही. त्यानंतर चट्टोग्राम न्यायालयाने सुनावणी २ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

चिन्मय कृष्ण दास यांचे  वकील रामेन रॉय यांच्यावर क्रूर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या घराची तोडफोड केल्याचेही इस्कॉन इंडियाने सोमवारी सांगितले. रॉय हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्यांनी म्हटलं. मुस्लिमबहुल बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंचा आवाज बंद करण्याच्या प्रयत्नात इस्लामवाद्यांचे हल्ले आणि धमक्यांचा हा एक भाग आहे, असंही इस्कॉनने म्हटलं.

दुसरीकडे, चितगाव बार असोसिएशनचा भाग असलेले मुस्लिम वकिल सतत  हिंदू वकिलांनाना धमकावत आहेत. खटला न लढवण्यासाठी वकिलांना धमक्या सतत दिल्या जात असल्याचे, दास यांच्या कायदेशीर संघाने सांगितले. तसेच काही वकिलांच्या चेंबरची तोडफोड करण्यात आली आणि हिंदू वकिलांना धमकावले गेल्याचेही चट्टोग्राममधील एका पुजाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशCrime Newsगुन्हेगारी