शहरं
Join us  
Trending Stories
1
117 ड्रोनचा वापर, युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे 40 लढाऊ विमानं, 5 एअरबेस उद्ध्वस्त; झेलेन्स्की म्हणाले, दीड वर्षांचं प्लॅनिंग...
2
नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार
3
तुर्कस्तानला झटक्यावर झटका.., पाकिस्तानची साथ पडतेय भारी; आता Air India नं घेतला मोठा निर्णय 
4
ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण
5
ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
6
मुक्काम पोस्ट, महामुंबई: नालेसफाईची पोलखोल! आता अधिकाऱ्यांचा पगारही ठेकेदारांनी द्यायचा का?
7
एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही
8
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार
9
नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!
10
युक्रेनची मोठी कारवाई, रशियावर केला एअर स्ट्राईक; उद्ध्वस्त केली ४१ लढाऊ विमाने
11
एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला... 
12
भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 
13
"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार
14
आजचे राशीभविष्य : ०२ जून २०२५; कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, प्रगतीच्या संधी येतील
15
VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग
16
धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय
17
सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!
18
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
19
३० वर्षांत डॉक्टरचे ३०० मुलांवर अत्याचार! तणाव सहन न झाल्याने दोन मुलांनी संपवलं जीवन

'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:25 IST

भारताने बेकायदेशीर प्रवेशाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यामुळे नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवास करू नये असा इशारा दिला आहे.

नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्याच नागरिकांना एक नवीन इशारा दिलाय. यामध्ये त्यांना भारत-नेपाळ सीमा भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिलाय. काही दिवसात भारताने बेकायदेशीर सीमा ओलांडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर हा इशारा दिला. गेल्या एका महिन्यात दूतावासाकडून असा हा तिसरा इशारा दिला. 

चीनी दूतवासाने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. "वारंवार इशारा देऊनही काही चिनी नागरिक सीमा भागात प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांना बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपाखाली अनेक प्रकरणांमध्ये ताब्यात घेण्यात आले, असंही यात म्हटले. 

"भारत आणि नेपाळचे नागरिक सीमापार प्रवासादरम्यान ओळखपत्र दाखवून एकमेकांच्या देशात प्रवास करू शकतात, परंतु हा नियम परदेशी नागरिकांना लागू होत नाही. चीनने आपल्या नागरिकांकडे वैध भारतीय व्हिसा असल्याशिवाय ते नेपाळमधून भारतात प्रवास करू शकत नाहीत, अशा सूचना दिल्या. 

चीनी दूतावासाने म्हटले आहे की, भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जरी एखाद्या व्यक्तीने अजाणतेपणे भारतीय सीमेत प्रवेश केला तरी त्याला अटक केली जाऊ शकते आणि दोन ते आठ वर्षांचा तुरुंगवास किंवा मोठा दंड होऊ शकतो. याशिवाय, या प्रकरणात जामिनाची तरतूद नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत