शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

चोराच्या उलट्या बोंबा! नेपाळ सरकारनं सीमेवरील घुसखोरीला सांगितलं वैध; ‘हा’ तर आमचाच भाग मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 11:09 IST

या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते.

ठळक मुद्देबेकायदेशीर घुसखोरी दोन्ही देशाच्या प्रशासनासाठी संकट निर्माण करु शकतेलिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या नेपाळचा भाग असल्याचा दावाभारत या भागात नेपाळी लोकांच्या प्रवेशावर बंदी आणू शकत नाही.

काठमांडू - लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणीसह ३९५ किमी भारतीय प्रदेश नेपाळने आपल्या नकाशात दाखवल्यानंतर आता पुन्हा एकदा नेपाळ कुरापती काढत आहे. या प्रदेशात अवैधरित्या घुसलेल्या नेपाळी नागरिकांची घुसखोरी वैध आहे असं नेपाळनं सांगितले आहे. नेपाळच्या धारचुला जिल्हा प्रशासनानं भारताच्या पत्राला उत्तर देताना दावा केला आहे की, नकाशा आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भाग नेपाळच्या क्षेत्रात येतो.

या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते. या संबंधात धारचूला(उत्तराखंड)च्या उपजिल्हाधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी नेपाळ प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. आता नेपाळने या पत्राला उत्तर दिलं आहे. नेपाळच्या धारचुला भागातील मुख्य जिल्हा अधिकारी शरद कुमार यांनी दावा केला केला आहे की, लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या नेपाळचा भाग आहे.

शरद कुमार यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात लिहिलं आहे की, सुगौली करार, नकाशा आणि ऐतिहासिक पुरावे याआधारे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा नेपाळच्या कार्यक्षेत्रात येतो, त्यामुळे भारत या भागात नेपाळी लोकांच्या प्रवेशावर बंदी आणू शकत नाही. हा नेपाळचा भाग असल्याने या क्षेत्रात येणे-जाणे नेपाळी नागरिकांसाठी सर्वसामान्य आहे. यापूर्वी १४ जुलै रोजी भारतीय अधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी एका ईमेलच्या माध्यमातून नेपाळी लोकांना या भागात अवैधरित्या घुसखोरी करण्यापासून रोखावं असं नेपाळला सांगितले होते.

तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच

तसेच अशाप्रकारे बेकायदेशीर घुसखोरी दोन्ही देशाच्या प्रशासनासाठी संकट निर्माण करु शकते. नेपाळने अशाप्रकारच्या घुसखोरीची माहितीही भारताला द्यायला हवी. भारतासोबत सीमावादादरम्यान नेपाळने लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भारतीय भाग नेपाळच्या नवीन नकाशात दाखवला आहे. पण भारताने नेपाळच्या या कृत्याचा निषेध करुन नवीन नकाशाला मान्य करण्यास नकार दिला आहे. नेपाळने नवीन नकाशास त्यांच्या संसदेत मान्यताही दिली आहे पण भारताने स्पष्टपणे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भारताचाच भाग असल्याचं सांगितले आहे.

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ