शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

Nepal Protests gen Z: घोटाळे, भ्रष्टाचाराने तरुण भडकले; नेपाळ पेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:53 IST

नेपाळमध्ये तरुणांच्या दबलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भडका, भ्रष्टाचाराविरुद्धच्या रोषाने भडकलेल्या भावनेतून युवकांचे बलिदान; आंदोलनाचे लोण इतरही शहरांत पसरू लागले. भारताला लागून असलेल्या प्रदेशात लागू केली संचारबंदी, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेश.

काठमांडू : नेपाळमध्ये सरकारी पातळीवर होत असलेले मोठमोठे घोटाळे, सरकारी नोकऱ्यांत दिल्या जाणाऱ्या नियुक्त्यांतील भ्रष्टाचार, सरकारचे चुकीचे निर्णय आणि सुशासनाच्या अभावाने आलेल्या नैराश्यातून या देशातील युवाशक्तीच्या संयमाचा बांध फुटल्याचे युवाशक्ती रस्त्यावर उतरली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवरच गदा आल्याने युवकांच्या दबलेल्या भावना भडकल्या आणि संसदेवर हल्ला झाला. पोलिस व लष्कराच्या गोळीबारात १८ युवकांचा जीव गेल्यावर काठमांडूत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लष्कर व पोलिसांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

पंतप्रधान ओली आक्रमक

सोशल मीडियाच्या माध्यमातून देश पोखरून तो कमकुवत करण्याचे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दिला आहे. सरकारच्या निर्णयाचे त्यांनी ठासून समर्थन केले. दरम्यान, नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनाना दिला आहे. सरकारने बंदी मागे घेण्यास नकार दिला आहे. 

पोलिसांमुळे भडकला जमाव

हे आंदोलन करणाऱ्या युवकांनुसार, शांततामय मार्गाने ही निदर्शने करण्याचा मानस होता. परंतु, युवक मोर्चा काढू पाहत असतानाच पोलिसांनी लाठीमारास सुरुवात केल्याने युवकांच्या भावनांचा भडका थेट संसदेवर हल्ला करण्यापर्यंत पोहोचला. दरम्यान, या आंदोलनाचे लोण आता इतर शहरांत पसरू लागले असून, देशात प्रचंड अशांतता पसरली आहे. 

कंपन्यांची नोंदणी रखडली

सरकारी नियमांनुसार प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला स्थानिक कार्यालय ठेवणे, चुकीचा-गैरसमज पसरवणारा मजकूर काढून टाकण्यासाठी स्थानिक अधिकारी नियुक्त करणे, कायदेशीर नोटिसांना उत्तर देणे आणि यूजर डेटा सरकारशी शेअर करणे बंधनकारक करण्यात आले होते. या डेटा प्रायव्हसी व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या अटी कंपन्यांना कठोर वाटत होत्या. त्यामुळे कंपन्यांची नोंदणी रखडली होती. 

प्रकरण काय? 

नेपाळ सरकारने ३ सप्टेंबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्रामसह २६ सोशल मीडिया साइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला. सरकारने यासाठी दि. २८ ऑगस्ट रोजी आदेश काढून कंपन्यांना सात दिवसांचा अवधी दिला होता. दि. २ सप्टेंबरला ही मुदत संपली आणि साइट बंद झाल्या.

हे ठरले कारण

सोशल मीडिया कंपन्यांच्या नोंदणीवरून सरकार झाले कठोर.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या अटी कंपन्यांना वाटल्या क्लिष्ट.

नोंदणीसह डेटा-प्रायव्हसीसाठीच्या उपाययोजनांची होती अट. 

कंपन्यांनी नोंदणी केली नसल्याने सरकारने घातला बंदीचा घाव.

... मग बोलायचे तरी कुणाबद्दल? 

देशातील भ्रष्टाचार किंवा गैरप्रकारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या युवकांचा आवाज दाबला गेल्याने हे आंदोलन झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियातून याबद्दल बोलायचे नाही, व्यक्त व्हायचे नाही तर मग बोलायचे तरी कशावर, कुणाबद्दल, असा प्रश्न युवकांनी उपस्थित केला.  

टॅग्स :NepalनेपाळSocial Mediaसोशल मीडिया