शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताच्या बाजूने बोलणार्‍या नेपाळी खासदारावर कारवाई, पक्षातून निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 20:32 IST

नेपाळने लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे.

ठळक मुद्देनेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सीमेच्या वादामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले आहेत.

नकाशा वादावर भारताच्या बाजूने बोलणार्‍या खासदार सरिता गिरी यांच्यावर जनता समाजवादी पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचे संसदीय सदस्यत्वही गेले आहे.

नेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सरिता गिरी या नकाशा वादावर सुरुवातीपासून नेपाळ सरकारला उघडपणे विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हा नकाशा बदलण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक नेपाळच्या संसदेमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र, या विधेयकाला सरिता गिरी यांनी विरोध केला होता.

काय आहे प्रकरण?नेपाळ सरकारद्वारे नवीन नकाशाला संसदेचा भाग बनविण्यासाठी आणलेल्या घटना दुरुस्ती प्रस्तावावर आपला वेगळा दुरुस्ती प्रस्ताव ठेवताना  समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांनी तो फेटाळण्याची मागणी केली होती. सरिता गिरी यांनी कालापानी भागाचा देशाच्या नव्या नकाशामध्ये समावेश करण्याच्या नेपाळ सरकारने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या खासदारांना आश्चर्य वाटले होते.

या विरोधामुळे सरिता गिरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या घरावर काळे झेंडा लावून देश सोडण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी त्याच्या समाजवादी पक्षानेही त्यावेळीच दूर केले होते. त्यावेळी सरिता गिरी यांनी हा नवीन सरकारचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली असता, त्यांच्या पक्षानेही हा दुरुस्ती प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रस्ताव मागे घेतला नाही तर पक्षाकडून निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

कोण आहे सरिता गिरी?सरिता गिरी या नेपाळच्या हिंदू खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2007 मध्ये मधेशी समाजाच्या हितासाठी राजकारणात आलेल्या सरिता गिरी यांना राजकारणाची चांगलीच समज आहे. सरिता गिरी यांच्यार नेपाळच्या हितापेक्षा भारतीय हितसंबंधांचा विचार करतात, असा नेहमी करण्यात आला आहे. त्या भारतीय असून त्यांनी नेपाळी नागरिकाशी लग्न केले आहे. 

भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात?

नेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सीमेच्या वादामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले आहेत. 8 मे रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख ते धाराचुला या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळने निषेध करत लिपुलेख यांना आपला भाग असल्याचे सांगितले. 18 मे रोजी नेपाळने एक नवीन नकाशा जारी केला. यामध्ये भारतातील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी या तीन भागांना आपला असल्याचे म्हटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतावर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपला भाग परत घेऊ असा दावाही केला होता. 11 जून रोजी नेपाळच्या मंत्रिमंडळाने 9 लोकांची समिती स्थापन केली. अनेक दिवसांपासून नेपाळ ज्या भूभागाचा दावा करीत आहे आणि भारताशी वाद घालत आहे. त्या भूभागाच्या अधिकाराचा नेपाळकडे पुरावा नाही.

आणखी बातम्या...

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

टॅग्स :Nepalनेपाळ