शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या बाजूने बोलणार्‍या नेपाळी खासदारावर कारवाई, पक्षातून निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 20:32 IST

नेपाळने लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे.

ठळक मुद्देनेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सीमेच्या वादामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले आहेत.

नकाशा वादावर भारताच्या बाजूने बोलणार्‍या खासदार सरिता गिरी यांच्यावर जनता समाजवादी पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचे संसदीय सदस्यत्वही गेले आहे.

नेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सरिता गिरी या नकाशा वादावर सुरुवातीपासून नेपाळ सरकारला उघडपणे विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हा नकाशा बदलण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक नेपाळच्या संसदेमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र, या विधेयकाला सरिता गिरी यांनी विरोध केला होता.

काय आहे प्रकरण?नेपाळ सरकारद्वारे नवीन नकाशाला संसदेचा भाग बनविण्यासाठी आणलेल्या घटना दुरुस्ती प्रस्तावावर आपला वेगळा दुरुस्ती प्रस्ताव ठेवताना  समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांनी तो फेटाळण्याची मागणी केली होती. सरिता गिरी यांनी कालापानी भागाचा देशाच्या नव्या नकाशामध्ये समावेश करण्याच्या नेपाळ सरकारने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या खासदारांना आश्चर्य वाटले होते.

या विरोधामुळे सरिता गिरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या घरावर काळे झेंडा लावून देश सोडण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी त्याच्या समाजवादी पक्षानेही त्यावेळीच दूर केले होते. त्यावेळी सरिता गिरी यांनी हा नवीन सरकारचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली असता, त्यांच्या पक्षानेही हा दुरुस्ती प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रस्ताव मागे घेतला नाही तर पक्षाकडून निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

कोण आहे सरिता गिरी?सरिता गिरी या नेपाळच्या हिंदू खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2007 मध्ये मधेशी समाजाच्या हितासाठी राजकारणात आलेल्या सरिता गिरी यांना राजकारणाची चांगलीच समज आहे. सरिता गिरी यांच्यार नेपाळच्या हितापेक्षा भारतीय हितसंबंधांचा विचार करतात, असा नेहमी करण्यात आला आहे. त्या भारतीय असून त्यांनी नेपाळी नागरिकाशी लग्न केले आहे. 

भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात?

नेपाळने लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. त्यामुळे सीमेच्या वादामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले आहेत. 8 मे रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख ते धाराचुला या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळने निषेध करत लिपुलेख यांना आपला भाग असल्याचे सांगितले. 18 मे रोजी नेपाळने एक नवीन नकाशा जारी केला. यामध्ये भारतातील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कलापानी या तीन भागांना आपला असल्याचे म्हटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतावर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपला भाग परत घेऊ असा दावाही केला होता. 11 जून रोजी नेपाळच्या मंत्रिमंडळाने 9 लोकांची समिती स्थापन केली. अनेक दिवसांपासून नेपाळ ज्या भूभागाचा दावा करीत आहे आणि भारताशी वाद घालत आहे. त्या भूभागाच्या अधिकाराचा नेपाळकडे पुरावा नाही.

आणखी बातम्या...

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

टॅग्स :Nepalनेपाळ