शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

म्यानमारने रोहिंग्याना परत बोलवावे, शेख हसीना यांनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 20:00 IST

देश सोडून बांगलादेशात आश्रयास आलेल्या भुकेल्या, संकटग्रस्त रोहिंग्यांना म्यानमारने आपल्या देशात परत बोलवावे असे आवाहन हसीना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना केले. म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसक घटनांचा वाजेद यांनी निषेधही केला.

जिनीवा, दि. 22 -  देश सोडून बांगलादेशात आश्रयास आलेल्या भुकेल्या, संकटग्रस्त रोहिंग्यांना म्यानमारने आपल्या देशात परत बोलवावे असे आवाहन हसीना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना केले. म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसक घटनांचा वाजेद यांनी निषेधही केला.

आमसभेत केलेल्या भाषणात शेख हसीना म्हणाल्या, "बांगलादेशने ८ लाख रोहिंग्यांना आश्रय दिला आहे त्यातील ४ लाख ३० हजार रोहिंग्या केवळ गेल्या चार आठवड्यांमध्ये म्यानमार सोडून आश्रयासाठी आले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या निरिक्षणाखाली म्यानमारच्या राखीन प्रांतामध्ये रोहिंग्यांसाठी सेफ झोन्स तयार करण्यात यावेत अशी मागणीही शेख हसीना यांनी या भाषणात केली. म्यानमारने रोहिंग्यांच्या परतीच्या वाटेत भूसुुंग पेरले आहेत , हे एकदम भयावह आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यांना संरक्षण आणि आत्मसन्मानासह परत येता येईल अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. "

२५ आँगस्टपासून राखिन प्रांतात भडकलेल्या हिंसेमुळे रोहिंग्यांचे जथ्थेच्या जथ्थे बांगलादेशात येऊन थडकत आहेत. कित्येकांनी नेफ नदी लाकडी बोटीच्या साह्याने ओलांडून धोका पत्करत बांगलादेशात प्रवेश केला आहे, या प्रवासात बोट बुडून काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. आश्रित रोहिंग्यांपैकी निम्मे लोक छावणीत राहात असून तेथे अन्न-पाणी, संरक्षण, वीज किंवा स्वच्छतेच्या कोणत्याही सेवा नाहीत. तसेच या रोहिंग्यांमध्ये ६० टक्के मुलांचा समावेश आहे. युनिसेफने सीमा अोलांडून बांगलादेशात आलेल्या १४०० अनाथ रोहिंग्यांची नोंद केली आहे.

1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला 

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना त्या म्हणाल्या की, नुकतेच देशातील संसदेनं 1971च्या युद्धामध्ये मृत्यू पावलेल्यानां श्रद्धांजली वाहून 25 मार्च हा नरसंहार दिवस म्हणून घोषित केला आहे.  यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 25 मार्च 1971 च्या रात्री पाकिस्तानच्या सैन्यांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. तेव्हापासून युद्धाला सुरुवात झाली. 16 डिसेंबरला हे युद्ध संपले. 9 महिने चाललेल्या या युद्धामध्ये 30 लाख लोकांचा बळी गेला. तर 20000 पेक्षा आधिक महिलांच लैगिंक शोषण करण्यात आले. 1971 च्या  मुक्ती संग्रामात आम्ही नरसंहारचे भयानक रुप पाहिले. 25 मार्च 1971मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं सुरु केलेल्या जघन्य ऑपरेशन सर्चलाइटनं  नरसंहारला सुरुवात केली.