शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 20:36 IST

कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे.

India-Canada Relation : भारत आणि कॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. पन्नू याने दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून तो ट्रूडोशी थेट संपर्कात आहे आणि त्यानेच भारताविरोधातील माहिती पुरवली, ज्या आधारे ट्रूडो यांनी कारवाई केली.

पन्नूने कॅनडातील सीबीसी न्यूजशी बोलताना तीन वर्षांपासून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. यासोबतच भारताविरोधात माहिती दिल्याचेही सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले. या हत्येप्रकरणी कॅनडा सतत भारतावर गंभीर आरोप करत आहे. 

पन्नू काय म्हणाला?दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नू म्हणाला की, "पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान न्याय, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी कॅनडाची वचनबद्धता दर्शवते. शिख फॉर जस्टिस गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयासोबत जवळून काम करत आहे आणि त्यांना सातत्याने गुप्तचर नेटवर्कची माहिती पुरवत आहे. आमच्या संस्थेने कॅनडा पीएमओला सांगितले होते की, भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि त्यांचे सहकारी हरदीप सिंग निज्जरची हत्या करणाऱ्या भारतीय एजंटना रसद आणि गुप्तचर माहिती पुरवत आहेत."

पन्नू पुढे म्हणाला, "आम्ही आमच्या गुरुंच्या आशीर्वादाने आयुष्य जगत आहोत. आपला जन्म ज्या दिवशी होतो, त्याच दिवशी मृत्यूची तारीख लिहिली जाते. त्यामुळे मी भारताकडून येणा-या हत्येच्या धमक्या किंवा भारत सरकारकडून माझ्याविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाला घाबरत नाही. पण, शेवटी मी जिवंत असेल, तेव्हाच खलिस्तानी मोहीम राबवू शकेन. त्यामुळे मी स्वत:ला सुरक्षित ठेवता यावे आणि जगभरात खलिस्तानी मोहीम सुरू ठेवता यावी यासाठी सर्व सुरक्षा उपाय करत आहे," असेही तो यावेळी म्हणाला.

भारताची कॅनडावर कारवाई निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा आरोप कॅनडा करत आहे, त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, 14 ऑक्टोबर रोजी भारताने कॅनडामधील उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अदिकाऱ्यांना परत बोलावल्याने संबंध अधिक बिघडले. निज्जरच्या हत्येच्या तपासात वर्मा आणि इतर उच्चायुक्तांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. विशेष म्हणजे, भारतानेही सहा कॅनेडियन उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा