शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 20:36 IST

कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे.

India-Canada Relation : भारत आणि कॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. पन्नू याने दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून तो ट्रूडोशी थेट संपर्कात आहे आणि त्यानेच भारताविरोधातील माहिती पुरवली, ज्या आधारे ट्रूडो यांनी कारवाई केली.

पन्नूने कॅनडातील सीबीसी न्यूजशी बोलताना तीन वर्षांपासून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. यासोबतच भारताविरोधात माहिती दिल्याचेही सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले. या हत्येप्रकरणी कॅनडा सतत भारतावर गंभीर आरोप करत आहे. 

पन्नू काय म्हणाला?दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नू म्हणाला की, "पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान न्याय, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी कॅनडाची वचनबद्धता दर्शवते. शिख फॉर जस्टिस गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयासोबत जवळून काम करत आहे आणि त्यांना सातत्याने गुप्तचर नेटवर्कची माहिती पुरवत आहे. आमच्या संस्थेने कॅनडा पीएमओला सांगितले होते की, भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि त्यांचे सहकारी हरदीप सिंग निज्जरची हत्या करणाऱ्या भारतीय एजंटना रसद आणि गुप्तचर माहिती पुरवत आहेत."

पन्नू पुढे म्हणाला, "आम्ही आमच्या गुरुंच्या आशीर्वादाने आयुष्य जगत आहोत. आपला जन्म ज्या दिवशी होतो, त्याच दिवशी मृत्यूची तारीख लिहिली जाते. त्यामुळे मी भारताकडून येणा-या हत्येच्या धमक्या किंवा भारत सरकारकडून माझ्याविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाला घाबरत नाही. पण, शेवटी मी जिवंत असेल, तेव्हाच खलिस्तानी मोहीम राबवू शकेन. त्यामुळे मी स्वत:ला सुरक्षित ठेवता यावे आणि जगभरात खलिस्तानी मोहीम सुरू ठेवता यावी यासाठी सर्व सुरक्षा उपाय करत आहे," असेही तो यावेळी म्हणाला.

भारताची कॅनडावर कारवाई निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा आरोप कॅनडा करत आहे, त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, 14 ऑक्टोबर रोजी भारताने कॅनडामधील उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अदिकाऱ्यांना परत बोलावल्याने संबंध अधिक बिघडले. निज्जरच्या हत्येच्या तपासात वर्मा आणि इतर उच्चायुक्तांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. विशेष म्हणजे, भारतानेही सहा कॅनेडियन उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा