शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

भारत, पाकसह 5 देशांत सर्वाधिक गरीब लोक; संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:00 IST

संयुक्त राष्ट्रे : भारत , पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात ...

संयुक्त राष्ट्रे : भारत, पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. त्यापैकी भारतात (२३.४ कोटी), पाकिस्तान (९.३ कोटी), इथिओपिया (८.६ कोटी), नायजेरिया (७.४ कोटी), काँगो (६.६ कोटी) गरीब लोक आहेत.  जगात १.१ कोटी लोक गरिबीने पिचून निघाले आहेत. त्यात निम्मे प्रमाण मुलांचे आहे. अशांपैकी ४० टक्के मुले युद्धग्रस्त तसेच सामाजिक, राजकीय स्थिती अतिशय नाजूक असलेल्या देशांमध्ये राहत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दारिद्र्य, मानवी विकास विषयक विभागाने तयार केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, गरिबांपैकी ८३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. आफ्रिकेचा काही भाग व दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यासह दहा मापदंडांचा वापर करून बहुआयामी गरिबी निर्देशांकांबाबतचे अहवाल संयुक्त राष्ट्रे व ऑक्सफर्ड विद्यापीठ २०१०पासून तयार करत आहे. यंदाच्या अहवालात ११२ देशांतील गरिबीचा आढावा घेण्यात आला. या देशांतील एकूण लोकसंख्या ६.३ अब्ज आहे. गरिबीत जगणाऱ्या लोकांपैकी निम्मे प्रमाण मुलांचे असून ते १८ वर्षांहून कमी वयोगटातील आहेत. 

११.७ कोटी लोकांनी जीव वाचविण्यासाठी केले पलायनदुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वाधिक संघर्ष २०२३मध्ये उफाळून आला. त्यात नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांचीही भर पडली. या कारणांमुळे त्यावर्षी ११.७ कोटी लोकांना जीव वाचविण्यासाठी स्वत:ची घरेदारे सोडून पलायन करावे लागले होते. जगातील ४५.५ कोटी गरीब लोकांना पोषक आहार, पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण आदी मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान