शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारत, पाकसह 5 देशांत सर्वाधिक गरीब लोक; संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:00 IST

संयुक्त राष्ट्रे : भारत , पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात ...

संयुक्त राष्ट्रे : भारत, पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. त्यापैकी भारतात (२३.४ कोटी), पाकिस्तान (९.३ कोटी), इथिओपिया (८.६ कोटी), नायजेरिया (७.४ कोटी), काँगो (६.६ कोटी) गरीब लोक आहेत.  जगात १.१ कोटी लोक गरिबीने पिचून निघाले आहेत. त्यात निम्मे प्रमाण मुलांचे आहे. अशांपैकी ४० टक्के मुले युद्धग्रस्त तसेच सामाजिक, राजकीय स्थिती अतिशय नाजूक असलेल्या देशांमध्ये राहत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दारिद्र्य, मानवी विकास विषयक विभागाने तयार केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, गरिबांपैकी ८३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. आफ्रिकेचा काही भाग व दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यासह दहा मापदंडांचा वापर करून बहुआयामी गरिबी निर्देशांकांबाबतचे अहवाल संयुक्त राष्ट्रे व ऑक्सफर्ड विद्यापीठ २०१०पासून तयार करत आहे. यंदाच्या अहवालात ११२ देशांतील गरिबीचा आढावा घेण्यात आला. या देशांतील एकूण लोकसंख्या ६.३ अब्ज आहे. गरिबीत जगणाऱ्या लोकांपैकी निम्मे प्रमाण मुलांचे असून ते १८ वर्षांहून कमी वयोगटातील आहेत. 

११.७ कोटी लोकांनी जीव वाचविण्यासाठी केले पलायनदुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वाधिक संघर्ष २०२३मध्ये उफाळून आला. त्यात नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांचीही भर पडली. या कारणांमुळे त्यावर्षी ११.७ कोटी लोकांना जीव वाचविण्यासाठी स्वत:ची घरेदारे सोडून पलायन करावे लागले होते. जगातील ४५.५ कोटी गरीब लोकांना पोषक आहार, पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण आदी मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान