शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

नेपाळ दौऱ्याला अपेक्षेहून अधिक यश

By admin | Updated: July 28, 2014 02:36 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या तीनदिवसीय नेपाळ दौऱ्याला अपेक्षेहून अधिक यश आल्याचे सांगितले.

काठमांडू : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या तीनदिवसीय नेपाळ दौऱ्याला अपेक्षेहून अधिक यश आल्याचे सांगितले. त्यांच्या या दौऱ्यात उभय देशांतील व्यापार करार मसुद्याला अंतिम रूप देणे आणि बदलत्या संदर्भात १९५० च्या ऐतिहासिक शांतता व मैत्री कराराचा आढावा घेण्यावर सहमती झाली.मायदेशी रवाना होण्यापूर्वी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी रविवारी पत्रकारांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, ‘मी नेपाळ दौऱ्याबाबत खूप समाधानी आहे. खूप आशा-अपेक्षांसह मी येथे आले होते आणि यास अपेक्षेहून अधिक यश आले. या दौऱ्याने द्विपक्षीय संबंध बळकट होतील आणि यासाठी एक रूपरेषा तयार केली आहे.’ भारतातील नव्या सरकारसोबत दोन्ही देशांतील बहुआयामी परस्पर संबंधांना ‘नवी गती’ देण्याची इच्छा नेपाळने व्यक्त केली. दोन्ही देशांनी अनेक अडचणी दूर केल्या आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. स्वराज यांनी राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव आणि पंतप्रधान सुशील कोईराला यांच्यासह प्रमुख नेपाळी नेत्यांशी बातचीत केली. विरोधी पक्षनेते व युनायटेड कम्युनिस्ट पार्टी आॅफ नेपाळ-माओवादीचे प्रमुख प्रचंड यांचीही भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ३ आॅगस्ट रोजी दोनदिवसीय नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्याने यास पार्श्वभूमी तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्रकुमार गुजराल यांच्यानंतर नेपाळ दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. १९९७ साली गुजराल हे नेपाळ दौऱ्यावर गेले होते. संरक्षण, सुरक्षा, व्यापार व ऊर्जा यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. संयुक्त आयोगाच्या बैठकीत २६ मुद्यांवर सहमती झाली. ऊर्जा व्यापार कराराच्या मसुद्यास लवकरात लवकर अंतिम रूप देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (वृत्तसंस्था)