शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पैसे, तेल नाही, शाळा बंद; श्रीलंकेची तिजोरी पूर्ण रिकामी, महागाई ६० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 07:56 IST

सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोलंबो : आपला शेजारी देश श्रीलंकेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. पैशांची तिजोरी पूर्ण रिकामी झाल्याने आता पेट्रोल, डिझेल, औषधे, अन्नधान्य सगळेच संपत चालले आहे. श्रीलंकेकडे पेट्रोल डिझेल शिल्लक नसून, तेल खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत. या संकटामुळे श्रीलंकेने शाळा पुन्हा एकदा आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, लोक खाण्या-पिण्यासाठी आणि इतर आवश्यक सामानासाठी वणवण भटकत आहेत.

सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री यांनी अगदी स्पष्ट करून सांगितले आहे की, त्यांच्याकडे आता अगदी काही दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. त्यांनी अन्य देशात रहात असलेल्या श्रीलंकन नागरिकांना पेट्रोल खरेदीसाठी देशात पैसे पाठवण्याचे आवाहन केले आहे.संकट दारावर...

१९९७ च्या आशियाई आर्थिक संकटाला २५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुलाखतीत मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी म्हटले की, आर्थिक संकट पुन्हा एकदा आपल्यावर ओढवू शकते, कारण गोष्टी फारशा बदललेल्या नाहीत. सतर्क राहिले नाही तर सर्व आशियाई देश आर्थिक संकटात फसतील.

पगार देण्यासाठी नोटांची छपाईश्रीलंकेची परदेशी चलनाची तिजोरी रिकामी झालीय आणि त्यांच्याकडे आयात केलेल्या वस्तूंची बिलं भरण्यासाठीही पैसे नाहीत. आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आता ते रुपयांची छपाई करत आहेत. सध्या श्रीलंकेत महागाई ६० टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

का आहेत शाळा बंद? तेल नसल्याने गेल्या एक महिन्यापासून येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शहरी भागातही गेल्या २ आठवड्यापासून शाळा बंद असून, त्या पुढील आठवड्यात उघडण्याची शक्यता कमी आहे. सरकार वीजपुरवठा तयार करणाऱ्या यंत्रणांनाही इंधन पुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे.

भारताकडून मदतीचा हाततेलासाठी पैसे नसल्याने श्रीलंकेने भारताकडे शेजारी देश म्हणून मदतीची याचना केली होती. त्यानंतर भारताने तत्काळ प्रतिसाद देत आतापर्यंत हजारो टन इंधन श्रीलंकेला पाठवले आहे. याचसोबत जीवनावश्यक वस्तूंची मदतही भारताकडून करण्यात येत आहे. तसेच पर्यटनासाठी भारतीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर यावेत म्हणून श्रीलंकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

पंतप्रधान काय म्हणतात...श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे संसदेत म्हणाले, आता आपण दिवाळखोर देश आहोत. त्यामुळे आयएमएफसोबत वाटाघाटी करताना आम्हाला अधिक अडचणी आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. दिवाळखोरीच्या परिस्थितीमुळे, आपल्याला आपला देश आयएमएफसमोर वेगळ्या पद्धतीने मांडावा लागला आहे, ते सध्या खूप कठीण आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका