शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पैसे, तेल नाही, शाळा बंद; श्रीलंकेची तिजोरी पूर्ण रिकामी, महागाई ६० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 07:56 IST

सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोलंबो : आपला शेजारी देश श्रीलंकेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. पैशांची तिजोरी पूर्ण रिकामी झाल्याने आता पेट्रोल, डिझेल, औषधे, अन्नधान्य सगळेच संपत चालले आहे. श्रीलंकेकडे पेट्रोल डिझेल शिल्लक नसून, तेल खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत. या संकटामुळे श्रीलंकेने शाळा पुन्हा एकदा आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, लोक खाण्या-पिण्यासाठी आणि इतर आवश्यक सामानासाठी वणवण भटकत आहेत.

सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री यांनी अगदी स्पष्ट करून सांगितले आहे की, त्यांच्याकडे आता अगदी काही दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. त्यांनी अन्य देशात रहात असलेल्या श्रीलंकन नागरिकांना पेट्रोल खरेदीसाठी देशात पैसे पाठवण्याचे आवाहन केले आहे.संकट दारावर...

१९९७ च्या आशियाई आर्थिक संकटाला २५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुलाखतीत मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी म्हटले की, आर्थिक संकट पुन्हा एकदा आपल्यावर ओढवू शकते, कारण गोष्टी फारशा बदललेल्या नाहीत. सतर्क राहिले नाही तर सर्व आशियाई देश आर्थिक संकटात फसतील.

पगार देण्यासाठी नोटांची छपाईश्रीलंकेची परदेशी चलनाची तिजोरी रिकामी झालीय आणि त्यांच्याकडे आयात केलेल्या वस्तूंची बिलं भरण्यासाठीही पैसे नाहीत. आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आता ते रुपयांची छपाई करत आहेत. सध्या श्रीलंकेत महागाई ६० टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

का आहेत शाळा बंद? तेल नसल्याने गेल्या एक महिन्यापासून येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शहरी भागातही गेल्या २ आठवड्यापासून शाळा बंद असून, त्या पुढील आठवड्यात उघडण्याची शक्यता कमी आहे. सरकार वीजपुरवठा तयार करणाऱ्या यंत्रणांनाही इंधन पुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे.

भारताकडून मदतीचा हाततेलासाठी पैसे नसल्याने श्रीलंकेने भारताकडे शेजारी देश म्हणून मदतीची याचना केली होती. त्यानंतर भारताने तत्काळ प्रतिसाद देत आतापर्यंत हजारो टन इंधन श्रीलंकेला पाठवले आहे. याचसोबत जीवनावश्यक वस्तूंची मदतही भारताकडून करण्यात येत आहे. तसेच पर्यटनासाठी भारतीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर यावेत म्हणून श्रीलंकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

पंतप्रधान काय म्हणतात...श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे संसदेत म्हणाले, आता आपण दिवाळखोर देश आहोत. त्यामुळे आयएमएफसोबत वाटाघाटी करताना आम्हाला अधिक अडचणी आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. दिवाळखोरीच्या परिस्थितीमुळे, आपल्याला आपला देश आयएमएफसमोर वेगळ्या पद्धतीने मांडावा लागला आहे, ते सध्या खूप कठीण आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका