शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

मोदी-शरीफ भेटीत ‘काश्मीर’ नाही !

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारी सकाळी रशियात उफा येथे भेट झाली पण त्यावेळी झालेल्या चर्चेेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारी सकाळी रशियात उफा येथे भेट झाली पण त्यावेळी झालेल्या चर्चेेत दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहण्यास कारणीभूत असलेल्या काश्मीरचा मात्र समावेश नव्हता.या भेटीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातही काश्मीरचा उल्लेख नाही किंवा भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर व पाकचे समपदस्थ अजीज अहमतद चौधरी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही काश्मीर प्रश्नाचा कोणताही विषय निघाला पाच कलमी निवेदन मोदी शरीफ बैठकीनंतर दोन्ही नेत्यानी एक संयुक्त निवेदन जाहीर केले असून त्यात पाच महत्वाच्या मुद्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हल्ल्याच्या पाकिस्तानातील खटल्याला वेग देण्याची गरज आहे. भारताने आणखी आवाजाचे नमुने द्यावेत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात अत्यंत मंद गतीने सुरु आहे, या हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवी यालाही सोडून देण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने लखवीविरोधात पुरावे न दिल्यामुळे न्यायालयाने लखवीला जामीन दिला आहे. मोदी यांनी पाकिस्तानला येण्याचे नवाज शरीफ यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. २०१६ साली सार्क परिषदेला मोदी उपस्थित राहतील. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाक भेटीनंतर १२ वर्षानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देत आहेत. दक्षिण अशियात शांतता प्रस्थापित करुन या भागाच्या विकासाला प्राधान्य देणे ही दोन्ही देशांची जबाबदारी असल्याचे मोदी व शरीफ यांनी मान्य केले असून, त्यासाठी दोन्ही देशाातील प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. काश्मीरमधून स्वागताचा सूरजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भारत- पाक चर्चा सुरू झाल्याचे स्वागत केले आहे. निष्पत्तीसाठी चर्चा दीर्घ काळ सुरू राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपीने चर्चेचे स्वागत केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)---------------पाकिस्तानात पंतप्रधानांवर टीकाइस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात झालेल्या वाटाघाटींचे प्रथम स्वागत केल्यानंतर, पाकिस्तानी नागरिक व माध्यमे या चर्चेत काश्मीरचा उल्लेख न केल्याबद्दल शरीफ यांच्यावर टीका करीत आहेत.शरीफ व मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या निवेदनात काश्मीरचा उल्लेख झालाच पाहिजे होता असे पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.