शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मिसाइल वादाप्रकरणी पाकिस्तानने उचलले मोठे पाऊल; कोणतीही अट मानण्यास भारताचा नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:48 IST

भारताची कृती बेजबाबदारपणाची असल्याचे सांगत याप्रकरणी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागण्याच्या तयारीत आहे.

इस्लामाबाद: तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan), सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतासमोर काही अटी ठेवल्याचा दावा करत पाकिस्तानने मोठे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्यासमोर उपस्थित केला आहे. तसेच क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची कृती योग्य नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांशी फोनवर चर्चा करून भारताची अशी कृती अतिशय बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यात दखल घ्यायला हवी, अशी मागणीही केली आहे. तसेच चुकून डागल्या गेलेल्या मिसाइल प्रकरणी भारत आणि पाकिस्तानची संयुक्त चौकशी समिती असावी, असेही म्हटले आहे. 

कोणतीही अट मानण्यास भारताचा नकार

पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत संयुक्त तपास समिती स्थापन करण्यास नकार देत असेल, तर पाकिस्तान अन्य पर्यायांवर विचार करेल. भारताच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. तसेच याप्रकरणी आम्ही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत दाद मागणार आहोत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळवले आहे, असेही ते म्हणाले. मात्र, पाकिस्तान कोणत्या पर्यायांवर विचार करत आहे, याबाबत स्पष्टपणे कोणतेही भाष्य केले नाही. 

दरम्यान, ०९ मार्च २०२२ रोजी भारताने आमच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले असून, एक सुपरसॉनिक ऑब्जेक्ट पाकिस्तानात पडले. यामुळे पाकिस्तानमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, यात जीवितहानी होऊ शकली असती, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे. यावर, नियमित तपासणी करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानात जाऊ पडले, असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान