शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

मिसाइल वादाप्रकरणी पाकिस्तानने उचलले मोठे पाऊल; कोणतीही अट मानण्यास भारताचा नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:48 IST

भारताची कृती बेजबाबदारपणाची असल्याचे सांगत याप्रकरणी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागण्याच्या तयारीत आहे.

इस्लामाबाद: तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan), सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतासमोर काही अटी ठेवल्याचा दावा करत पाकिस्तानने मोठे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्यासमोर उपस्थित केला आहे. तसेच क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची कृती योग्य नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांशी फोनवर चर्चा करून भारताची अशी कृती अतिशय बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यात दखल घ्यायला हवी, अशी मागणीही केली आहे. तसेच चुकून डागल्या गेलेल्या मिसाइल प्रकरणी भारत आणि पाकिस्तानची संयुक्त चौकशी समिती असावी, असेही म्हटले आहे. 

कोणतीही अट मानण्यास भारताचा नकार

पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत संयुक्त तपास समिती स्थापन करण्यास नकार देत असेल, तर पाकिस्तान अन्य पर्यायांवर विचार करेल. भारताच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. तसेच याप्रकरणी आम्ही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत दाद मागणार आहोत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळवले आहे, असेही ते म्हणाले. मात्र, पाकिस्तान कोणत्या पर्यायांवर विचार करत आहे, याबाबत स्पष्टपणे कोणतेही भाष्य केले नाही. 

दरम्यान, ०९ मार्च २०२२ रोजी भारताने आमच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले असून, एक सुपरसॉनिक ऑब्जेक्ट पाकिस्तानात पडले. यामुळे पाकिस्तानमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, यात जीवितहानी होऊ शकली असती, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे. यावर, नियमित तपासणी करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानात जाऊ पडले, असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान