शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

चिनी सोशल मीडियावर नेपाळमध्ये भारताविरोधात मेसेज व्हायरल, ड्रॅगनच्या कागाळ्या सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:17 IST

नेपाळमध्ये लोकप्रिय असलेले वायबर, व्हॉटस् अ‍ॅप, चिनी वुई चॅट या सोशल मीडिया अ‍ॅपवरून भारतविरोधातील मजकूर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : नेपाळमधील सत्ताधारी कम्युन्सिट पक्षात पंतप्रधान के.पी. ओली यांच्या नेतृत्वावरून फूट पडली असून, त्याचा परिणाम भारतविरोधावरही होत आहे. नेपाळमध्ये लोकप्रिय असलेले वायबर, व्हॉटस् अ‍ॅप, चिनी वुई चॅट या सोशल मीडिया अ‍ॅपवरून भारतविरोधातील मजकूर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. नेपाळमधील भारतीय दूतावास व परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या साऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. चीनच्या कागाळ्यांमुळे नेपाळने भारतविरोधी भूमिका घेतली. चीनच्या दबावामुळेच नेपाळी कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक व पंतप्रधान ओली यांचा राजीनामा टळला. मात्र, नेपाळी तरुणांमध्ये रोष वाढल्याने दोन्ही देशांच्या रोटी-बेटी व्यवहारावर दीर्घ परिणाम होण्याची भीती आहे.नेपाळसंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप एकदाही  धोरणात्मक विधान केले नाही, याकडे लक्ष वेधून हा अधिकारी म्हणाला, मागील आठवड्यात मंत्रालयातील पूर्व आशिया विभागातील संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी नेपाळ दूतावासातील अधिकाºयाशी चर्चा केली. या चर्चेचा वृत्तांत मात्र प्रसिद्ध करण्यात आला नाही. नेपाळमध्ये भारतविरोधी भावना वाढणे दोन्ही देशांच्या हिताचे नाही, असा स्पष्ट संदेश अधिकाºयांनी संबधितांना दिला. नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बबिता शर्मा यांच्या मते पक्षात फूट टाळणे व चीनच्या दबावामुळेच सध्या कम्युनिस्ट पक्षाची बैठक टळली. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये वाढ व काही भागात पूरस्थितीमुळे सरकार स्थिर ठेवण्यावरच पक्षाचा भर आहे.काय आहे चर्चा?सोशल मीडियावर पंतप्रधान ओली यांचे वादग्रस्त नकाशा मंजूर करणाºया  विधेकावरील भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एखादे राष्ट्र छोटे आहे म्हणून ते कमजोर आहे, असे नाही. ‘भारताने नेपाळची सीमा मान्य करावी. राजमुद्रेवर सत्यमेव जयते लिहिले आहे.या नकाशावर भारताची सत्यमेव जयते भूमिका असेल की ‘सिंहमेव जयते’, हे महत्त्वाचे ठरेल, ‘असे विधान ओली यांनी केले होते. याच विधानाचा संदर्भ देऊन वुई चॅटवर चिनी सबटायटल्समध्ये हा व्हिडिओ नेपाळमध्ये व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भारताच्या बाजूने बोलून चीनपासून सावध राहण्यास सांगणाºया सर्वांना सरसकट देशद्रोही म्हटले जात आहे.मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे चीन-नेपाळ संबंध गेल्या काही वर्षांत दृढ झाले आहेत. लाखो नेपाळी विद्यार्थी चिनी भाषा शिकण्यासाठी चीनमध्ये प्रवेश घेतात. नेपाळसाठी राष्ट्रपती शिष्यवृत्तीदेखील गेल्या काही वर्षांत चीनने देऊ केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत-नेपाळचे संबंध तणावाचे असून, तेथे भारतविरोध वाढतो आहे.आता नेपाळने भारतीय प्रसारमाध्यमांवर बंदी घातली आहे. त्यावरूनही नेपाळमध्ये सोशल मीडियावर पंतप्रधान ओलींचे समर्थन केले जात आहे. काठमांडूमध्ये ओलींच्या समर्थनार्थ व भारत धार्जिण्या एनसीपी नेत्यांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चांचे लोण आता नेपाळच्या छोट्या-मोठ्या शहरांमध्ये पसरले आहे.

टॅग्स :NepalनेपाळchinaचीनIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय