शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनचे हे संबंधही संपले! शेवटच्या पत्रकाराला चीन सोडण्याचे आदेश, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:12 IST

चिनी अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या या रिपोर्टरला देश सोडण्यास सांगितलेय तो भारताने केलेल्या कृतीचा बदला आहे.

कोरोना काळापासून भारत आणि चीनदरम्यान घुसखोरी आणि भारतीय सैन्यावर हल्ले केल्याने तणावाचे वातावरण आहे. हे वातावरण आता अखेरच्या स्टेजवर आले असून वेगवेगळ्या स्तरावर दोन्ही देशांनी एकमेकांशी संबंध तोडण्यास सुरुवात केली आहे. भारताने चिनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदी आणली होती. ती कायम ठेवली आहे. असे असताना आता दोन्ही देशांतील पत्रकारितेचे संबंधही जवळपास संपुष्टात येत आहेत. 

चीनने भारताच्या एकमेव पत्रकाराला देश सोडण्याचे आदेश दिले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पत्रकाराला या महिन्याच्या अखेरपर्यंत चीन सोडून जाण्यास सांगितले आहे. या पत्रकारावर चिनी पत्रकारांसोबत चुकीचे वागल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. परंतू प्रकरण वेगळेच आहे. 

चिनी अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या या रिपोर्टरला देश सोडण्यास सांगितलेय तो भारताने केलेल्या कृतीचा बदला आहे. या पत्रकाराने चीन सोडले तर बिजिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकही पत्रकार राहणार नाही. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे चीनमध्ये चार पत्रकार होते. मात्र, गेल्या आठवड्यातच हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टरने चीन सोडला. प्रसार भारती आणि द हिंदूच्या दोन पत्रकारांचा व्हिजा रिन्यू करण्यास चीनने एप्रिलमध्येच नकार दिला होता. यामुळे त्यांनी तेव्हाच देश सोडला होता. 

चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. हा प्रकार भारतातही काही काळापूर्वी घडला आहे. भारतात फक्त एकच चिनी पत्रकार उरला आहे, जो अजूनही व्हिसाच्या नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी, भारताने चीनच्या अधिकृत माध्यम शिन्हुआ न्यूज एजन्सी आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या दोन पत्रकारांचे व्हिसा नूतनीकरण अर्ज भारताने नाकारले होते. यामुळे आता चीनने देखील तेच पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली होती. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत