शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

भारत-चीनचे हे संबंधही संपले! शेवटच्या पत्रकाराला चीन सोडण्याचे आदेश, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:12 IST

चिनी अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या या रिपोर्टरला देश सोडण्यास सांगितलेय तो भारताने केलेल्या कृतीचा बदला आहे.

कोरोना काळापासून भारत आणि चीनदरम्यान घुसखोरी आणि भारतीय सैन्यावर हल्ले केल्याने तणावाचे वातावरण आहे. हे वातावरण आता अखेरच्या स्टेजवर आले असून वेगवेगळ्या स्तरावर दोन्ही देशांनी एकमेकांशी संबंध तोडण्यास सुरुवात केली आहे. भारताने चिनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदी आणली होती. ती कायम ठेवली आहे. असे असताना आता दोन्ही देशांतील पत्रकारितेचे संबंधही जवळपास संपुष्टात येत आहेत. 

चीनने भारताच्या एकमेव पत्रकाराला देश सोडण्याचे आदेश दिले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पत्रकाराला या महिन्याच्या अखेरपर्यंत चीन सोडून जाण्यास सांगितले आहे. या पत्रकारावर चिनी पत्रकारांसोबत चुकीचे वागल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. परंतू प्रकरण वेगळेच आहे. 

चिनी अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या या रिपोर्टरला देश सोडण्यास सांगितलेय तो भारताने केलेल्या कृतीचा बदला आहे. या पत्रकाराने चीन सोडले तर बिजिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकही पत्रकार राहणार नाही. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे चीनमध्ये चार पत्रकार होते. मात्र, गेल्या आठवड्यातच हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टरने चीन सोडला. प्रसार भारती आणि द हिंदूच्या दोन पत्रकारांचा व्हिजा रिन्यू करण्यास चीनने एप्रिलमध्येच नकार दिला होता. यामुळे त्यांनी तेव्हाच देश सोडला होता. 

चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. हा प्रकार भारतातही काही काळापूर्वी घडला आहे. भारतात फक्त एकच चिनी पत्रकार उरला आहे, जो अजूनही व्हिसाच्या नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी, भारताने चीनच्या अधिकृत माध्यम शिन्हुआ न्यूज एजन्सी आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या दोन पत्रकारांचे व्हिसा नूतनीकरण अर्ज भारताने नाकारले होते. यामुळे आता चीनने देखील तेच पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली होती. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत