शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:57 IST

Pakistan Water Crisis : पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

सध्या तरी पाकिस्तान पुराच्या भयंकर तडाख्याने त्रस्त आहे, पण भविष्यातील चित्र आणखीनच भयानक आहे. ज्या प्रकारे तिथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे, त्यावरून येणाऱ्या काळात पाकिस्तानला पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागेल अशी भीती आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नुसार, काही अहवालांनी भविष्यात पाकिस्तानमध्ये पाण्याची किती गंभीर टंचाई येणार आहे, हे स्पष्ट केलं आहे.

परिस्थिती अत्यंत बिकट

पर्यावरण शास्त्रज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की, दक्षिण आशियामध्ये पूर आणि दुष्काळाचं चक्र सातत्याने सुरू राहील. अशा परिस्थितीत, पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी निश्चितपणे वाढणार आहेत. इथल्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाण्याची कायमच कमतरता जाणवते आहे. वॉटर पॉव्हर्टी इंडेक्सनुसार, पाकिस्तान सध्या जगात १५व्या क्रमांकावर असा देश आहे, जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (International Organization for Migration) मते, २०३५पर्यंत पाकिस्तानला पाण्यासाठी तळमळण्याची वेळ येईल.

पाण्याची पातळी सातत्याने घटतेय

वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड-पाकिस्तानच्या अहवालानुसार, इथे पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १९४७मध्ये पाकिस्तानकडे ५६०० क्यूबिक मीटर पाणी उपलब्ध होतं. मात्र, २०२३पर्यंत ते घटून फक्त ९३० क्यूबिक मीटर राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) देखील याच गोष्टीकडे लक्ष वेधते. त्यांच्या मते, जगात सर्वाधिक पाण्याची कमतरता पाकिस्तानमध्ये आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, येणाऱ्या काळात इथे तग धरणंही कठीण होईल.

सिंधू पाणी करार रद्द झाल्याने संकट कसं वाढलं?

या सगळ्यामध्ये, भारताने सिंधू जल करार (Indus Waters Treaty) रद्द करून पाकिस्तानचं पाणी अडवलं आहे. या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अधिकार मिळत होता. या नद्यांमधून मिळणाऱ्या पाण्यामुळे पाकिस्तानच्या ८० टक्के शेतीविषयक गरजा आणि एक तृतीयांश वीज निर्मितीची गरज पूर्ण होत होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आता पाकिस्तानसाठी समस्या आणखी वाढल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीIndiaभारत