शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:57 IST

Pakistan Water Crisis : पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

सध्या तरी पाकिस्तान पुराच्या भयंकर तडाख्याने त्रस्त आहे, पण भविष्यातील चित्र आणखीनच भयानक आहे. ज्या प्रकारे तिथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे, त्यावरून येणाऱ्या काळात पाकिस्तानला पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागेल अशी भीती आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नुसार, काही अहवालांनी भविष्यात पाकिस्तानमध्ये पाण्याची किती गंभीर टंचाई येणार आहे, हे स्पष्ट केलं आहे.

परिस्थिती अत्यंत बिकट

पर्यावरण शास्त्रज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की, दक्षिण आशियामध्ये पूर आणि दुष्काळाचं चक्र सातत्याने सुरू राहील. अशा परिस्थितीत, पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी निश्चितपणे वाढणार आहेत. इथल्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाण्याची कायमच कमतरता जाणवते आहे. वॉटर पॉव्हर्टी इंडेक्सनुसार, पाकिस्तान सध्या जगात १५व्या क्रमांकावर असा देश आहे, जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (International Organization for Migration) मते, २०३५पर्यंत पाकिस्तानला पाण्यासाठी तळमळण्याची वेळ येईल.

पाण्याची पातळी सातत्याने घटतेय

वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड-पाकिस्तानच्या अहवालानुसार, इथे पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १९४७मध्ये पाकिस्तानकडे ५६०० क्यूबिक मीटर पाणी उपलब्ध होतं. मात्र, २०२३पर्यंत ते घटून फक्त ९३० क्यूबिक मीटर राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) देखील याच गोष्टीकडे लक्ष वेधते. त्यांच्या मते, जगात सर्वाधिक पाण्याची कमतरता पाकिस्तानमध्ये आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, येणाऱ्या काळात इथे तग धरणंही कठीण होईल.

सिंधू पाणी करार रद्द झाल्याने संकट कसं वाढलं?

या सगळ्यामध्ये, भारताने सिंधू जल करार (Indus Waters Treaty) रद्द करून पाकिस्तानचं पाणी अडवलं आहे. या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अधिकार मिळत होता. या नद्यांमधून मिळणाऱ्या पाण्यामुळे पाकिस्तानच्या ८० टक्के शेतीविषयक गरजा आणि एक तृतीयांश वीज निर्मितीची गरज पूर्ण होत होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आता पाकिस्तानसाठी समस्या आणखी वाढल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीIndiaभारत