शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:57 IST

Pakistan Water Crisis : पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

सध्या तरी पाकिस्तान पुराच्या भयंकर तडाख्याने त्रस्त आहे, पण भविष्यातील चित्र आणखीनच भयानक आहे. ज्या प्रकारे तिथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे, त्यावरून येणाऱ्या काळात पाकिस्तानला पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागेल अशी भीती आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नुसार, काही अहवालांनी भविष्यात पाकिस्तानमध्ये पाण्याची किती गंभीर टंचाई येणार आहे, हे स्पष्ट केलं आहे.

परिस्थिती अत्यंत बिकट

पर्यावरण शास्त्रज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की, दक्षिण आशियामध्ये पूर आणि दुष्काळाचं चक्र सातत्याने सुरू राहील. अशा परिस्थितीत, पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी निश्चितपणे वाढणार आहेत. इथल्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाण्याची कायमच कमतरता जाणवते आहे. वॉटर पॉव्हर्टी इंडेक्सनुसार, पाकिस्तान सध्या जगात १५व्या क्रमांकावर असा देश आहे, जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (International Organization for Migration) मते, २०३५पर्यंत पाकिस्तानला पाण्यासाठी तळमळण्याची वेळ येईल.

पाण्याची पातळी सातत्याने घटतेय

वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड-पाकिस्तानच्या अहवालानुसार, इथे पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १९४७मध्ये पाकिस्तानकडे ५६०० क्यूबिक मीटर पाणी उपलब्ध होतं. मात्र, २०२३पर्यंत ते घटून फक्त ९३० क्यूबिक मीटर राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) देखील याच गोष्टीकडे लक्ष वेधते. त्यांच्या मते, जगात सर्वाधिक पाण्याची कमतरता पाकिस्तानमध्ये आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, येणाऱ्या काळात इथे तग धरणंही कठीण होईल.

सिंधू पाणी करार रद्द झाल्याने संकट कसं वाढलं?

या सगळ्यामध्ये, भारताने सिंधू जल करार (Indus Waters Treaty) रद्द करून पाकिस्तानचं पाणी अडवलं आहे. या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अधिकार मिळत होता. या नद्यांमधून मिळणाऱ्या पाण्यामुळे पाकिस्तानच्या ८० टक्के शेतीविषयक गरजा आणि एक तृतीयांश वीज निर्मितीची गरज पूर्ण होत होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आता पाकिस्तानसाठी समस्या आणखी वाढल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीIndiaभारत