शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 09:19 IST

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत.

वॉशिंग्टन : जगातील पाण्याचे साठे नष्ट होत असून, निम्म्याहून अधिक मोठे जलाशय कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले असून, त्यातून हा इशारा देण्यात आला आहे.

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत. त्यांच्या मते शास्त्रज्ञांचे लक्ष नद्यांच्या दुरवस्थेकडे आहे. मात्र, तलावांकडे कोणाचे लक्ष नाही. कॅस्पियन सागर आणि अरल सागर यांसारख्या मोठ्या तलावांमधील नैसर्गिक आपत्ती हे एक मोठे संकट आहे, असे संशोधक म्हणतात. (वृत्तसंस्था)

दरवर्षी २२ गिगा टन पाणी घटलेसंशोधकांनी १९९२ ते २०२० या कालावधीत पृथ्वीवरील १,९७२ मोठे तलाव आणि जलाशयांचा उपग्रहांतून काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. या ३० वर्षांमध्ये पाणी- पातळीमध्ये किती फरक दिसला, हे तपासण्यात आले. त्यातून त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ५३ टक्के तलावांमध्ये दरवर्षी २२ गिगा टन एवढे पाणी कमी झाल्याचे आढळले आहे.

१९७२ तलाव आणि जलाशयांचा अभ्यास करण्यात आला. भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणीही जलसाठा घटला. मोठे तलाव आणि जलाशयांमध्ये सुमारे ६०३ क्युबिक किलोमीटर एवढे पाणी घटले आहे. जगातील कोरड्या भागांशिवाय दमदार पावसाच्या भागातील तलावांमध्येही जलस्तर कमी झाला आहे. यामुळे संशोधकांनाही धक्का बसला आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे. परिणामी बाष्पीभवन वाढले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे संकटपाणी कमी होण्यामागे प्रत्येकजण हवामान बदलाचे कारण देत आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पाण्याचा वाढता वापर. जगाची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये प्रचंड वाढली आहे. साहजिकच पाण्याचा वापरही त्या तुलनेत वाढला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई