शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 09:19 IST

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत.

वॉशिंग्टन : जगातील पाण्याचे साठे नष्ट होत असून, निम्म्याहून अधिक मोठे जलाशय कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले असून, त्यातून हा इशारा देण्यात आला आहे.

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत. त्यांच्या मते शास्त्रज्ञांचे लक्ष नद्यांच्या दुरवस्थेकडे आहे. मात्र, तलावांकडे कोणाचे लक्ष नाही. कॅस्पियन सागर आणि अरल सागर यांसारख्या मोठ्या तलावांमधील नैसर्गिक आपत्ती हे एक मोठे संकट आहे, असे संशोधक म्हणतात. (वृत्तसंस्था)

दरवर्षी २२ गिगा टन पाणी घटलेसंशोधकांनी १९९२ ते २०२० या कालावधीत पृथ्वीवरील १,९७२ मोठे तलाव आणि जलाशयांचा उपग्रहांतून काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. या ३० वर्षांमध्ये पाणी- पातळीमध्ये किती फरक दिसला, हे तपासण्यात आले. त्यातून त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ५३ टक्के तलावांमध्ये दरवर्षी २२ गिगा टन एवढे पाणी कमी झाल्याचे आढळले आहे.

१९७२ तलाव आणि जलाशयांचा अभ्यास करण्यात आला. भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणीही जलसाठा घटला. मोठे तलाव आणि जलाशयांमध्ये सुमारे ६०३ क्युबिक किलोमीटर एवढे पाणी घटले आहे. जगातील कोरड्या भागांशिवाय दमदार पावसाच्या भागातील तलावांमध्येही जलस्तर कमी झाला आहे. यामुळे संशोधकांनाही धक्का बसला आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे. परिणामी बाष्पीभवन वाढले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकसंख्येवर भीषण पाणीटंचाईचे संकटपाणी कमी होण्यामागे प्रत्येकजण हवामान बदलाचे कारण देत आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पाण्याचा वाढता वापर. जगाची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये प्रचंड वाढली आहे. साहजिकच पाण्याचा वापरही त्या तुलनेत वाढला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई