शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:25 IST

नूर खान हा सामान्य एअरबेस नाही. इथं पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे.

कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेवरील नागरी वस्तीत हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे हल्ले परतावून लावले मात्र पाकच्या नापाक कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील अनेक सैन्य तळांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. स्वत: पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याची कबुली दिली. भारताच्या हल्ल्यात नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली. पाकिस्तानी पंतप्रधानांचा हा कबुलीनामा जगासमोर आला आहे.

जो पाकिस्तान कालपर्यंत विजयाच्या बाता मारत होते. भारताविरुद्ध युद्धात पाकिस्तानचा विजय झाला असा खोटा दावा करत होते. यातूनच पाकिस्तानी नागरिक सेलीब्रेशन करत होते. मात्र पाक पंतप्रधानांच्या या विधानामुळे युद्धात पाकिस्तानलाच मोठा फटका बसला हे सिद्ध झाले. शहबाज शरीफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात की, ९ आणि १० तारखेच्या रात्री अडीच वाजता जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून भारताने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले सुरू केलेत, ज्यातील एक मिसाईल नूर खान एअरबेसवर पडली असं सांगितले. आमच्या वायूसेनेने देशाला वाचवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याशिवाय चीनी लढाऊ विमानांचा वापर केला असं शरीफ यांनी कबूल केले.

सर्वात महत्त्वाचा नूर खान एअरबेस

नूर खान हा सामान्य एअरबेस नाही. इथं पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे. इस्लामाबादपासून नजीक असलेला हा एअरबेस पाकिस्तानातील संवेदनशील भागात येतो. आतापर्यंत हल्ल्यानंतर आलेल्या सॅटेलाईट फोटोत भारतीय सैन्याचा हल्ला अगदी अचूक होता हे दिसून आले. भारताने निश्चित केलेल्या टार्गेटवर हल्ला यशस्वी केला. इस्लामाबाद येथील नूर खान एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाला ऑपरेशन्सवेळी मदत करते. स्पेस कंपनीसह अनेक सॅटेलाईट कंपन्यांनी या एअरबेसचे हल्ला झाल्यानंतरचे फोटो प्रकाशित केले आहेत. 

दरम्यान, पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. एका शिष्टमंडळात पाच-सहा खासदार असतील. अशा ७-८ शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशात पाठविले जाणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर