शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चीनच्या नादी लागलेले विरोधक मालदीवमध्ये उतरले रस्त्यावर, सरकारची भारताकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 12:57 IST

भारतीय दूतावासासह अनेक मोठ्या संस्था असलेल्या राजधानी मालेच्या बाहेर सुरक्षा वाढविली आहे. माले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कार्यालयाला आंदोलकांनी पेटवून दिले आहे.

मालदीवमध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना सोडण्याच्या मागणीसाठी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत तेथील सरकार जनतेशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी भारत समर्थित प्रकल्पांवर जोर देत आहे. भारतानं नव्याने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर जनतेला मिळावी, यावरही सरकार भर देत आहे. चीनच्या अधीन असलेल्या विरोधी पक्षांनी सरकारनं देश 'विकल्याचा' आरोप केला आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आहे. भारतीय दूतावासासह अनेक मोठ्या संस्था असलेल्या राजधानी मालेच्या बाहेर सुरक्षा वाढविली आहे. माले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कार्यालयाला आंदोलकांनी पेटवून दिले आहे.परिस्थितीचे अतिशयोक्ती लक्षात घेता मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली तैनात करण्यात आले आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, 'दोन्ही देश (मालदीव आणि भारत) सहकार्यासाठी वचनबद्ध आहेत. भारतीय सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत आहेत आणि लवकरच मालदीवच्या लोकांना त्याचा फायदा होण्यास सुरुवात होईल. यामीन यांना सोडण्याच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात यामीन अबी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. स्थानिक सरकारी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या सूचनांच्या विरोधात हा मेळावा घेण्यात आला. यामीनच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वात मालदीवच्या विरोधी पक्षांनी रविवारी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, देश अभूतपूर्व आर्थिक संकटात अडकलेला आहे, ज्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आणि कर्जाच्या संकटाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर 2018मध्ये इब्राहिम सोलीह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मालदीवशी संबंधांची नवी सुरुवात असल्याचं भारतानं म्हटलं होतं. अधिका-यांनी सांगितले की, सोलीह यांचे सरकार स्थापनेनंतर भारताने आतापर्यंत मालदीवला 2 अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Maldivesमालदीव