शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मालदीवचा भारताला धक्का; भेट दिलेलं हेलिकॉप्टर परत देण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:06 IST

मालदीव चीनच्या जवळ जात असल्याने भारताला मोठा धक्का

मालदीवसोबतचे भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवने भारताला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. भारत सरकारकडून भेट म्हणून देण्यात आलेले हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केली आहे. भारताने मालदीवच्या नौदलाला दोन हेलिकॉप्टर्स भेट म्हणून दिली होती. यापैकी एक हेलिकॉप्टर परत नेण्याची सूचना मालदीवकडून करण्यात आली आहे. मालदीवने हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी सुरू केल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यासंदर्भात अब्दुल्ला यामीन सरकारशी संवाद साधला जात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालदीवला भारताकडून ध्रुव अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरऐवजी (एएलएच) डॉर्नियर मॅरिटाईम सर्विलान्स एअरक्राफ्ट हवे आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जातो, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.मालदीवला जे हेलिकॉप्टर भारताला परत करायचे आहे, ते अद्दू बेटावर तैनात आहे. मात्र हे हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केल्यामुळे भारत आणि मालदीवमधील सुरक्षा संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला असताना मालदीवकडून हेलिकॉप्टर परत करण्याचे वृत्त आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. चीनकडून मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. चीनने मालदीवमध्ये पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याचा धडाका लावला आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या मदतीने चीनकडून 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'ची उभारणी केली जाते आहे. यामुळे भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्यातच काल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी रविवारी मालदीवचा दौरा केला. मालदीव, चीन आणि पाकिस्तानची ही जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान