शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 7 सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 21:54 IST

Pakistan news: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे.

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला हे लोक वैतागले असून यामध्ये 7 सैनिक मारले गेले आहेत. यामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. 

बलुचिस्तानमधील हरनाईमधील शारिंग पोस्टवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये सात सैनिक मारले गेले आहेत. यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्य़ासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण भागात पुन्हा अत्याचार सुरु केले आहेत. पाकिस्तानी सैन्य सामान्य माणसांच्या घरात घुसून त्यांच्यासोबत अभद्र वागते. त्यांना विरोध केल्यात दहशतवाद्याचा ठपका ठेवून गोळी झाडून मारले जाते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, रात्री उशिरा सैन्याच्या पोस्टवर झालेल्या हल्ल्यात ७ सैनिक शहीद झाले, हे ऐकून दु:ख झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती आहेत. आमचा देश साहसी सैनिकांसोबत उभा आहे, जे भारत समर्थित दहशतवाद्यांचा सामना करतात. 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंजपूर जिल्ह्यात सैन्याच्या एका ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानी कर्नलसह ८ जण जखमी झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर मे नंतरचा हा तिसरा हल्ला होता. बलुचिस्तानी नागरिक आता कराचीसह अन्य भागातही पाकिस्तानी लष्करावर हल्ले करू लागले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान