शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 7 सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 21:54 IST

Pakistan news: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे.

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला हे लोक वैतागले असून यामध्ये 7 सैनिक मारले गेले आहेत. यामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. 

बलुचिस्तानमधील हरनाईमधील शारिंग पोस्टवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये सात सैनिक मारले गेले आहेत. यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्य़ासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण भागात पुन्हा अत्याचार सुरु केले आहेत. पाकिस्तानी सैन्य सामान्य माणसांच्या घरात घुसून त्यांच्यासोबत अभद्र वागते. त्यांना विरोध केल्यात दहशतवाद्याचा ठपका ठेवून गोळी झाडून मारले जाते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, रात्री उशिरा सैन्याच्या पोस्टवर झालेल्या हल्ल्यात ७ सैनिक शहीद झाले, हे ऐकून दु:ख झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती आहेत. आमचा देश साहसी सैनिकांसोबत उभा आहे, जे भारत समर्थित दहशतवाद्यांचा सामना करतात. 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंजपूर जिल्ह्यात सैन्याच्या एका ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानी कर्नलसह ८ जण जखमी झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर मे नंतरचा हा तिसरा हल्ला होता. बलुचिस्तानी नागरिक आता कराचीसह अन्य भागातही पाकिस्तानी लष्करावर हल्ले करू लागले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान