शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 20:04 IST

एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.

काठमांडू - भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापलेला सीमाप्रश्न पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.

 'लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आहे. त्याचा संपूर्ण भूगोलच भारताच्या कब्जात आहे. कालापानी येथे लष्कर तैनात करून भारताने तिथून लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर कब्जा केला आहे, असे नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा म्हणाले. 

नेपाळचे पंतप्रधान पुढे म्हणाले की, लष्कर तैनात करून आमच्या कडून आमचा भूभाग बळकावून घेण्यात आला आहे. जोपर्यंत तिथे भारतीय लष्कर नव्हते तोपर्यंत ती जमीन आमच्याकडे होती. आता तिथे सैन्य तैनात असल्याने आम्ही तिथे जाऊ शकत नाही. एकप्रकारे त्या जमिनीवर कब्जा केलेला आहे.  त्यामुळे आम्ही आमचा मित्र देश असलेल्या भारताला हे वारंवार सांगत आहोत की ती जमीन आमची आहे. आम्हाला आमची जमीन परत हवी आहे. 

याबाबत चर्चेतून मार्ग निघावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र चर्चेचा तोडगा तेव्हाच निघेल, जेव्हा आमची जमीन आम्हाला परत मिळेल, तेच सत्य आहे आणि त्याचा विजय होईल, आम्ही आमची जमीन मिळवून दाखवू, असेही नेपाळच्या पंतप्रधानांनी सांगितले.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय