शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 20:04 IST

एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.

काठमांडू - भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापलेला सीमाप्रश्न पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.

 'लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आहे. त्याचा संपूर्ण भूगोलच भारताच्या कब्जात आहे. कालापानी येथे लष्कर तैनात करून भारताने तिथून लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर कब्जा केला आहे, असे नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा म्हणाले. 

नेपाळचे पंतप्रधान पुढे म्हणाले की, लष्कर तैनात करून आमच्या कडून आमचा भूभाग बळकावून घेण्यात आला आहे. जोपर्यंत तिथे भारतीय लष्कर नव्हते तोपर्यंत ती जमीन आमच्याकडे होती. आता तिथे सैन्य तैनात असल्याने आम्ही तिथे जाऊ शकत नाही. एकप्रकारे त्या जमिनीवर कब्जा केलेला आहे.  त्यामुळे आम्ही आमचा मित्र देश असलेल्या भारताला हे वारंवार सांगत आहोत की ती जमीन आमची आहे. आम्हाला आमची जमीन परत हवी आहे. 

याबाबत चर्चेतून मार्ग निघावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र चर्चेचा तोडगा तेव्हाच निघेल, जेव्हा आमची जमीन आम्हाला परत मिळेल, तेच सत्य आहे आणि त्याचा विजय होईल, आम्ही आमची जमीन मिळवून दाखवू, असेही नेपाळच्या पंतप्रधानांनी सांगितले.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय