शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:40 IST

संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने हा दावा केला आहे.

५ ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आवामी लीगच्या शेख हसीना यांच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शेख हसीना कसाबसा जीव वाचवून ढाकातून बाहेर पडल्या आणि भारतात शरण आल्या. त्या अजूनही भारतात आहेत परंतु त्यांच्याबाबत अधिकृत माहिती नाही. बांग्लादेश पुन्हा एकदा अराजकतेच्या वाटेवर उभा आहे. तिथल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर राजकीय पक्ष, सैन्य, कर्मचारी आणि शिक्षक नाराज आहेत. ज्या परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले तशीच परिस्थिती बांगलादेशात सध्या निर्माण होत आहे. त्यात आता नवीन खुलासा समोर आला आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने दावा केलाय की, हसीना सरकार त्यांच्यामुळेच पडले आहे. त्याशिवाय त्याने भारतासोबत युद्धाची धमकी दिली आहे. OsintTV ने त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातील एक व्यक्ती भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकत आहे. OsintTV ने तो संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मुजम्मिल हाजमी असल्याचं म्हटलं आहे. तो जो काही बोलत आहे त्यावरून तो पाकिस्तान सरकार आणि तिथल्या सैन्याचा प्रवक्ता असल्याचे दिसून येते. त्याने ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत बांगलादेशातील सरकार पाडल्याचा दावाही केला आहे.

मोदींचा उल्लेख करत हा दहशतवादी म्हणतो की, आम्ही मागील वर्षी बांगलादेशात तुला मात दिली. तू ७ मेला रात्रीच्या अंधारात आला, आम्ही १० मे रोजी उजेडात आलो होतो. आम्ही प्रत्युत्तर देत आहोत, यापुढेही देत राहू. जर तू मैदानात आला, तर आम्हीही मैदानात येऊ अशी धमकी त्याने दिली आहे. मागील वर्षी बांगलादेशात सत्तांतर झाले. त्यात तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून देश सोडावा लागला. तिथे आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी शेख हसीना सुरक्षित भारतात आल्या. त्यानंतर बांगलादेशात जनरल वाकर उज जमानच्या नेतृत्वात सरकार बनवले. त्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली. 

मोहम्मद युनूस यांना कमान देण्यात आली. बांगलादेशात परकीय शक्तींनी अराजकता माजवून तिथले सरकार पाडले असा आरोप होत आहे. खासकरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तानी समर्थक जमात ए इस्लामी चेहरा समोर आला होता. परंतु आता लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने जो दावा केला आहे त्यातून भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान उभं राहिल्याचे दिसून येते.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत