शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:40 IST

संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने हा दावा केला आहे.

५ ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आवामी लीगच्या शेख हसीना यांच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शेख हसीना कसाबसा जीव वाचवून ढाकातून बाहेर पडल्या आणि भारतात शरण आल्या. त्या अजूनही भारतात आहेत परंतु त्यांच्याबाबत अधिकृत माहिती नाही. बांग्लादेश पुन्हा एकदा अराजकतेच्या वाटेवर उभा आहे. तिथल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर राजकीय पक्ष, सैन्य, कर्मचारी आणि शिक्षक नाराज आहेत. ज्या परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले तशीच परिस्थिती बांगलादेशात सध्या निर्माण होत आहे. त्यात आता नवीन खुलासा समोर आला आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने दावा केलाय की, हसीना सरकार त्यांच्यामुळेच पडले आहे. त्याशिवाय त्याने भारतासोबत युद्धाची धमकी दिली आहे. OsintTV ने त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातील एक व्यक्ती भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकत आहे. OsintTV ने तो संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मुजम्मिल हाजमी असल्याचं म्हटलं आहे. तो जो काही बोलत आहे त्यावरून तो पाकिस्तान सरकार आणि तिथल्या सैन्याचा प्रवक्ता असल्याचे दिसून येते. त्याने ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत बांगलादेशातील सरकार पाडल्याचा दावाही केला आहे.

मोदींचा उल्लेख करत हा दहशतवादी म्हणतो की, आम्ही मागील वर्षी बांगलादेशात तुला मात दिली. तू ७ मेला रात्रीच्या अंधारात आला, आम्ही १० मे रोजी उजेडात आलो होतो. आम्ही प्रत्युत्तर देत आहोत, यापुढेही देत राहू. जर तू मैदानात आला, तर आम्हीही मैदानात येऊ अशी धमकी त्याने दिली आहे. मागील वर्षी बांगलादेशात सत्तांतर झाले. त्यात तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून देश सोडावा लागला. तिथे आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी शेख हसीना सुरक्षित भारतात आल्या. त्यानंतर बांगलादेशात जनरल वाकर उज जमानच्या नेतृत्वात सरकार बनवले. त्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली. 

मोहम्मद युनूस यांना कमान देण्यात आली. बांगलादेशात परकीय शक्तींनी अराजकता माजवून तिथले सरकार पाडले असा आरोप होत आहे. खासकरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तानी समर्थक जमात ए इस्लामी चेहरा समोर आला होता. परंतु आता लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने जो दावा केला आहे त्यातून भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान उभं राहिल्याचे दिसून येते.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत