शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चिंताजनक! कोरोनामुक्त झाल्यानंतर २ आठवडे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; लँसेटचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:57 IST

Coronavirus: जागतिक पातळीवर अद्यापही कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लंडन: जागतिक पातळीवर अद्यापही कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासह काही देशांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यातच आता कोरोनामुक्त झाल्यानंतर पुढील दोन आठवडे हार्ट अटॅकचा धोका सर्वांत जास्त असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. (lancet study claimed risk of heart attack and stroke is increased in first two weeks after corona cured)

लंडन येथील सुप्रसिद्ध जर्नल द लँसेट यांनी केलेल्या एका संशोधनातून सदर बाब समोर आली आहे. लँसेटच्या अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिले दोन आठवडे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक यांचा धोका तीन पटीने वाढतो. लँसेटने स्वीडन येथे लाखो नागरिकांवर केलेल्या संशोधनातून सदर बाब समोर आल्याचे म्हटले गेले आहे. 

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तिपटीने अधिक

स्वीडन येथे गतवर्षीच्या १ फेब्रुवारी ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत ८६ हजार ७४२ कोरोना रुग्ण आणि ३ लाख ४८ हजार ४८१ सामान्य नागरिकांवर यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. येथील उमिया विद्यापीठातील अभ्यासकर्ते ओस्वाल्डो फोन्सेका रॉड्रिगेज यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तीन पटीने वाढल्याचे दिसून आले. कोरोनामुक्त झालेल्यांचे वय, लिंग आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, भारतात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्याने विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणे योग्य नाही असे म्हटले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणे योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. आता लोकांना सतर्क राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHeart Attackहृदयविकाराचा झटका