शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:51 IST

Kuwait Fire : इमारतीत कंपनीने आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीत एकूण १९६ लोक राहत होते, जे की त्या इमारतीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. 

कुवेतमध्ये बुधवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आहेत. मृतांमध्ये ४० हून अधिक भारतीय नागरिक असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कुवेत सरकारने इमारत मालक आणि इतर लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 

एनबीटीसी ग्रुपने दक्षिण कुवेतमधील मंगाफ येथे ही इमारत भाड्याने घेतली होती. या इमारतीत कंपनीने आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीत एकूण १९६ लोक राहत होते, जे की त्या इमारतीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. अनेक रिपोर्ट्समध्ये, मजुरांना कोंबून ठेवलं होतं, जबरदस्तीने या इमारतीत राहण्यास भाग पाडलं जात असल्याचं म्हटलं आहे.

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. या सहा मजली इमारतीच्या किचनमध्ये आग लागली आणि नंतर ती संपूर्ण इमारतीत पसरली. येथे राहणारे बहुतांश मजूर रात्रीची शिफ्ट करून परतले होते आणि झोपले होते. आगीमुळे अनेकांना बाहेरही येता आलं नाही. अडगळीच्या जागेमुळे अनेकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी आपापल्या मजल्यावरून उड्याही मारल्या.

गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे की, बहुतेक जणांचा मृत्यू हा आगीत गुदमरल्यामुळे झाला आहे. त्याचबरोबर कुवेतचे अमीर मिशाल अल अहमद अल जबेर अल सबाह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या आगीच्या घटनेत एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे तो म्हणजे संपूर्ण इमारतीसाठी एकच एन्ट्री गेट होता. इमारतीचे छत पूर्णपणे बंद होतं, त्यामुळे मजूर छतावर जाऊन देखील स्वत:ला वाचवू शकले नाहीत.

या आगीनंतर कुवेत सरकार पूर्ण एक्शन मोडमध्ये आले आहे. आगीच्या घटनेनंतर कुवेतचे गृहमंत्री शेख फहाद अल युसूफ अल सबह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात गृहनिर्माण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी मजुरांना नियमांचं उल्लंघन करून अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहण्यास भाग पाडले जात होतं, जेणेकरून कंपनी मालक खर्चात कपात करू शकतील.

टॅग्स :fireआग