शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 09:00 IST

Kuwait Building Fire: या प्रकरणात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोक हे केरळचे आहेत

Kuwait Building Fire: कुवेतच्या दक्षिण मंगफ येथे बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक हे केरळमधील आहेत. या अपघातात केरळमधील तब्बल २३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय उर्वरित सात वेगवेगळ्या राज्यातील लोकांचाही समावेश आहे.

सर्व ४५ मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने (C-130J) भारतात आणले जात आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे स्वत: या विमानात असणार आहेत आणि ते कुवेती अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. हे विमान प्रथम कोची येथे उतरणार आहे. यानंतर विमान पुन्हा दिल्लीला येणार आहे, कारण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर भारतीय राज्यातील काही लोकांचाही समावेश आहे.

मृतांपैकी किती जण कोणत्या राज्यातील होते?

  • केरळ- २३
  • तामिळनाडू- ७
  • आंध्र प्रदेश- ३
  • उत्तर प्रदेश- ३
  • ओडिशा-    २
  • उर्वरित सात वेगवेगळ्या राज्यांमधून प्रत्येकी १ - एकूण ७

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग

ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत बहुतांश मजूर राहत होते. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली. बुधवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात भीषण आग लागली. आग लागल्याचे पाहून काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, तर काही जणांचा आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

टॅग्स :fireआगindian air forceभारतीय हवाई दलDeathमृत्यू