शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'कुलभूषण निर्दोष नाही', पंतप्रधान इम्रान खानचा भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:17 IST

पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.'आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे कौतुकच, कारण कुलभूषण जाधव हे निर्दोष नसून त्यांना भारताकडे सोपवा किंवा सुटका करा, असे या आदेशात म्हटले नाही.

इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल म्हणजे भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया भारतातील दिग्गज नेत्यांनी दिली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निर्णयाचे स्वागत करताना, सत्य आणि न्याय जगासमोर आल्याचं सांगितलं. कुलभूषण जाधव यांना लवकरच न्याय मिळेल, अशी मला खात्री असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान यांनीही ट्विट करुन ICJ च्या निकालाचे स्वागत केले आहे. 

पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. विशेष म्हणजे १५-१ अशा फरकानं हा निकाल भारताच्या बाजूनं लागला. यामुळे भारताला मोठा दिलासा असून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर भारतात आनंद साजरा करण्यात आला. तर माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती आजच्या निकालात महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाचे मनपूर्वक स्वागत असे सुषमा यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचा आदेश आयसीजेने दिला आहे. मात्र, या निकालाचे स्वागत करताना इम्रान खान यांनी हा निकाल म्हणजे कुलभूषण जाधव यांची निर्दोष सुटका नव्हे, असे म्हटले आहे. 

'आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे कौतुकच, कारण कुलभूषण जाधव हे निर्दोष नसून त्यांना भारताकडे सोपवा किंवा सुटका करा, असे या आदेशात म्हटले नाही. कुलभूषण हे पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात दोषी आहेत. त्यामुळे पुढील कायदेशीर लढाईसाठी पाकिस्तान सज्ज' असल्याचे इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानKulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तान