शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 11:35 IST

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकचे लोक पोटापाण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांचे भारतविरोधाचे खूळ सुटत नाही, असा घणाघात भारताच्या मुत्सद्दी सीमा पूजानी यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी यूएनएचआरसीमध्ये भारतावर खोटे आरोप केले होते. त्याला पूजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकला दहशतवादी देश संबोधत तो भारताविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नाही तर पूजानी यांनी तुर्कस्तान व इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही खेद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे टाळा, असा सल्ला त्यांनी तुर्की आणि ओआयसीला दिला. जम्मू-काश्मीर व लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे व कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)

पाकने मानवाधिकारावर बोलणे हाच मोठा विनोदपाकिस्तानी मंत्र्यांच्या तोंडून मानवाधिकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोद आहे. आवाज उठवणारे पाकिस्तानात गायब होतात. पाकिस्तानच्या स्वतःच्या चौकशी आयोगाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जे भारतातील अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःच्या अंगणात डोकावले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या पाकच्या मंत्रीगेल्या गुरुवारी पाकच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपरिक व अपारंपरिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त केली होती. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्या  म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर