शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

कॅनडात खलिस्तानी समर्थक असल्याची ट्रूडोंची कबुली; म्हणाले, "सगळे हिंदूसुद्धा मोदी समर्थक नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:23 IST

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडात खलिस्तान समर्थक असल्याचे उघडपणे मान्य केले आहे.

India-Canada Row:कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडात खलिस्तान समर्थक असल्याचे उघडपणे मान्य केले आहे. भारताने अनेकदा कॅनडावर खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला होता. आता मात्र ट्रुडो यांनीही हे उघडपणे मान्य केले आहे. पण कॅनडात राहणारे खलिस्तान समर्थक इथल्या शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नसल्याचेही जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. तसेच कॅनडात पंतप्रधान मोदींचे अनेक हिंदू समर्थक आहेत. पण तरीही ते इथल्या संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, असेही ट्रुडो म्हणाले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे गेल्या काही दिवसांपासून सूर बदलताना दिसत आहे. असं असलं तरी त्यांचे भारताशी असलेले वैर कमी झालेले नाही. ट्रूडो यांनी कॅनडात खलिस्तानी समर्थक मोठ्या संख्येने आहेत हे मान्य केलं आहे. पण असेही म्हणाले की सर्व शीख खलिस्तानी नाहीत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात खलिस्तानी राहत असल्याचे उघडपणे कबूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रूडो यांच्या या वक्तव्यामुळे ट्रूडो सरकार खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याच्या भारताचा आरोप खरा ठरला.

"कॅनडात खलिस्तानचे अनेक समर्थक आहेत, पण ते संपूर्ण शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. कॅनडात मोदी सरकारचेही समर्थक आहेत, पण ते सर्व हिंदू कॅनेडियन लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत," पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं आहे.

आठवड्याभरापूर्वी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. या काळात खलिस्तान्यांनी महिला आणि मुलांवर हल्ले केले. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी जस्टिन ट्रूडो यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या हिंसाचाराचा निषेध केला. यासाठी हिंदू आणि शीख समाजाला जबाबदार धरू नये, असे ते म्हणाले. हिंसाचार करणारे लोक हिंदू आणि शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असं ट्रूडोंनी म्हटलं.

दरम्यान, गेल्या वर्षी कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर कॅनडाने या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला. भारताने आरोप झाल्यानंतर कॅनडाकडून पुरावे मागितले. मात्र कॅनडाने अजूनही भारताला पुरावे दिले नाही. हा वाद इतका वाढला की भारताने कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आणि कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देशातून बाहेर काढले. 

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत