शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : जगभरातील देशांनी झिडकारले; इम्रान खानची आरएसएसवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:44 IST

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याविरोधात पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे. भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका, रशिय़ा, चीनसारख्या देशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चीनव्य़तिरिक्त अन्य देशांनी त्यांच्याकडे लक्षच न दिल्याने इम्रान यांनी थेट आरएसएसवरच आरोप केले आहेत. 

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता. हा प्रस्ताव बहुमताने मंजुरही करण्यात आला होता. यामुळे काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह उघड झाले होते. काँग्रेसच्या एका राज्यसभेच्या खासदाराने पक्षाच्या भुमिकेवर नाराज होत राजीनामाही दिला होता. 

या नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानने विरोध नोंदवत भारताशी व्यापार बंद केला होता. तसेच भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना माघारी पाठविले होते. यावरच न थांबता इम्रान खान यांनी भारताने पुलवामा सारख्या हल्ल्याला निमंत्रण दिल्याची धमकीही दिली होती. तसेच इम्रान खानने अमेरिका, रशिया आणि चीन यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. मात्र, चीनने विरोध नोंदवत हस्तक्षेपास नकार दिला होता. तर अमेरिका आणि रशियाने हात आखडते घेतले आहेत. यामुळे त्यांच्याकडून निराशा पदरी पडल्याने इम्रान खान यांनी आरएसएसवर ट्विटरद्वारे टीका केली आहे. 

आरएसएसच्या नाझी विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्याने काश्मीरमध्ये जमावबंदीची स्थिती आहे, असे ट्विट इम्रान खान याने केले आहे. यावर भाजपाकडून राम माधव यांनी प्रत्यूत्तर देताना आम्ही जिन्नांच्या दोन देश आणि शेख अब्दुल्लांच्या तीन देशांच्या सिद्धांताला संपविले आहे. इम्रान खान यांनी भारतामध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्तानातील धार्मिक अतिवादाला संपवून दाखवावा, असे आव्हान दिले आहे. 

इम्रान खानने काश्मीरचा ढाचाच बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच जगभरातील देशांना यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन त्याने केले. हिटलरने केलेल्या नरसंहारावेळी जसे आंतरराष्ट्रीय समूहाने तोंड बंद ठेवले होते, तसेच भारतावेळी शांत राहणार का, असा प्रश्नही त्याने जगभरातील देशांना केला आहे. 

टॅग्स :Article 370कलम 370Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा