शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

Jammu Kashmir : जगभरातील देशांनी झिडकारले; इम्रान खानची आरएसएसवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:44 IST

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याविरोधात पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे. भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका, रशिय़ा, चीनसारख्या देशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चीनव्य़तिरिक्त अन्य देशांनी त्यांच्याकडे लक्षच न दिल्याने इम्रान यांनी थेट आरएसएसवरच आरोप केले आहेत. 

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता. हा प्रस्ताव बहुमताने मंजुरही करण्यात आला होता. यामुळे काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह उघड झाले होते. काँग्रेसच्या एका राज्यसभेच्या खासदाराने पक्षाच्या भुमिकेवर नाराज होत राजीनामाही दिला होता. 

या नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानने विरोध नोंदवत भारताशी व्यापार बंद केला होता. तसेच भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना माघारी पाठविले होते. यावरच न थांबता इम्रान खान यांनी भारताने पुलवामा सारख्या हल्ल्याला निमंत्रण दिल्याची धमकीही दिली होती. तसेच इम्रान खानने अमेरिका, रशिया आणि चीन यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. मात्र, चीनने विरोध नोंदवत हस्तक्षेपास नकार दिला होता. तर अमेरिका आणि रशियाने हात आखडते घेतले आहेत. यामुळे त्यांच्याकडून निराशा पदरी पडल्याने इम्रान खान यांनी आरएसएसवर ट्विटरद्वारे टीका केली आहे. 

आरएसएसच्या नाझी विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्याने काश्मीरमध्ये जमावबंदीची स्थिती आहे, असे ट्विट इम्रान खान याने केले आहे. यावर भाजपाकडून राम माधव यांनी प्रत्यूत्तर देताना आम्ही जिन्नांच्या दोन देश आणि शेख अब्दुल्लांच्या तीन देशांच्या सिद्धांताला संपविले आहे. इम्रान खान यांनी भारतामध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्तानातील धार्मिक अतिवादाला संपवून दाखवावा, असे आव्हान दिले आहे. 

इम्रान खानने काश्मीरचा ढाचाच बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच जगभरातील देशांना यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन त्याने केले. हिटलरने केलेल्या नरसंहारावेळी जसे आंतरराष्ट्रीय समूहाने तोंड बंद ठेवले होते, तसेच भारतावेळी शांत राहणार का, असा प्रश्नही त्याने जगभरातील देशांना केला आहे. 

टॅग्स :Article 370कलम 370Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा