शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एअर स्ट्राईकबाबत नवा खुलासा; 190 दहशतवादी ठार, तर 45 दहशतवादी अद्यापही रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 09:33 IST

विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे. 

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालकोटभागात एअर स्ट्राईक करण्यात आले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. मात्र विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे. 

इटलीतील या पत्रकाराने पाकिस्तानचा दावा खोटा ठरवत भारतीय हवाई दलाने बालकोटमध्ये केलेल्या हल्ल्यात जवळपास 170 दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 20 दहशतवाद्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आजही 45 दहशतवादी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे. 

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्याने पाकिस्तानची झोप उडाली. भारतीय हवाई दलाचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचं पाकिस्तानचे मान्य केलं असलं तरी आमच्या डोंगराळ भागात झाडांवर बॉम्ब फेकून पळून गेल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मात्र इटलीतील पत्रकाराच्या या रिपोर्टमुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं. 

43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी

इटलीतील पत्रकार फ्रांसिसा मारिनो यांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून केलेल्या शोधमोहीमेत त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट समोर आणला आहे. ज्यातून भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं समोर आलंय. 

इटलीतील स्ट्रिंगरएशिया डॉटआईटी यांनी छापलेल्या अहवालात मारिनो यांनी बालकोट एअर स्ट्राईकचा अहवाल छापला आहे. भारतीय हवाई दलाची विमाने पहाटे 3.30 च्या सुमारास बालकोट भागात घुसली. हा हल्ला झाल्यानंतर जवळपास पहाटे 6 वाजता घटनास्थळावर पाकिस्तान सेनेची एक तुकडी पोहचली. या तुकडीने जखमी दहशतवाद्यांना तात्काळ रुग्णालयात पोहचवलं. एअर स्ट्राईकचं सत्य लपविण्यासाठी पाकिस्तानने या जखमी दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. 

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

निवडणुकीमध्ये भाजपाकडून एअर स्ट्राईकचा वापर करण्यात येत असल्याने विरोधकांकडून नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी एअर स्ट्राईकबाबत केंद्राला पुरावे मागितले तर पाकिस्तानला फायदा होईल अशी वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतात असा आरोप भाजपाकडून काँग्रेसवर केला जातो. मात्र या रिपोर्ट निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी भाजपाला दिलासा मिळेल हे नक्की.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीItalyइटली