शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:42 IST

गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे.

न्यूयॉर्क : जवळपास आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या ‘नासा’च्या भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, ते १२ मार्च रोजी पृथ्वीवर दाखल होतील. मात्र, पृथ्वीवर उतरल्यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असून, गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे.

पृथ्वीवर उतरल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या शारीरिक बदलांना सामोरे जावे लागेल. पृथ्वीवरचे गुरुत्वाकर्षण त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यासारखे असले. आमच्यासाठी गुरुत्वाकर्षण ही सर्वात मोठी समस्या असेल व साधी पेन्सील उचलणेदेखील एक प्रकारचे आव्हान ठरणार असल्याचे अंतराळवीर बुच यांनी स्पष्ट केले.

नेमके काय होते?

जास्त काळ अंतराळात राहिल्यास हाडांची घनता प्रत्येक महिन्याला एक टक्का कमी होतो. त्यामुळे पाय, पाठ व मानेच्या हाडांवर विपरित परिणाम होतो.

गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरातील द्रव्य पदार्थ डोक्याकडे जातात. त्यामुळे डोळ्यांच्या मागील नसांवर विपरित परिणाम होतो.

त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते व नवीन चष्म्याची गरज पडू शकते.

सुनीता विल्यम्स म्हणाल्या...

परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात अवघड काम असेल, असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अंतराळवीरांना पृथ्वीवर दाखल झाल्यानंतर पुनर्वसन कार्यक्रमातून जावे लागणार आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीरातील स्नायू अशक्त होतात.

तिथे प्रत्येक गोष्ट तरंगत असल्याने काम करण्यासाठी शरीराला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे पृथ्वीवर उतरल्यानंतर अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणासोबत जुळवून घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. या करणांमुळे सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना काही दिवस चालण्या-फिरण्यासाठी तसेच संतुलन राखण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

टॅग्स :NASAनासा