शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

…म्हणून 'त्यांना' पोलिसांनी अटक केली; पाकमधील दोन भारतीय अधिकारी गायब प्रकरणाला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 6:52 PM

जियो टीव्हीच्या रिपोर्टनुसार दूतावास कार्यालयाबाहेरील रस्त्यावर भारतीय उच्चायुक्ताच्या बीएमडब्ल्यू कारने एका पाकिस्तानी नागरिकाला धडक दिली.

इस्लामाबाद – एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात लढाई करत आहे तर दुसरीकडे आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानभारताविरोधात षडयंत्र रचत आहे. भारतात दहशतवादी कारवायांना यश येत नसल्याने पाकच्या गुप्तचर यंत्रणेने आता आयएसआय इस्लामाबादमध्ये तैनात भारतीय दूतावासांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी इस्लामाबादमध्ये तैनात दोन भारतीय अधिकारी गायब झाल्याचा बातमी मिळाली. त्यानंतर आता पाकिस्तानी मीडियाने असा दावा केला आहे की, इस्लामाबाद पोलिसांनी या दोघांना हिट एन्ड रन प्रकरणात अटक केली आहे.

जियो टीव्हीच्या रिपोर्टनुसार दूतावास कार्यालयाबाहेरील रस्त्यावर भारतीय उच्चायुक्ताच्या बीएमडब्ल्यू कारने एका पाकिस्तानी नागरिकाला धडक दिली. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. इस्लामाबाद पोलिसांनी आंतरराष्ट्रीय नियमांच्या अंतर्गत या भारतीय उच्चायुक्तांना अटक केली आहे. डिप्लोमॅटिक कायदानुसार कोणताही देश दुसऱ्या देशातील राजदूताला अटक करु शकत नाही.

इंग्रजी वाहिनी टाईम्स नाऊच्या सूत्रांनुसार ही माहिती मिळाली आहे की, हे दोघं अधिकारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे आहेत, सकाळी ८.३० वाजता ते ड्रायव्हरच्या ड्यूटीसाठी बाहेर आले होते, भारताने अधिकाऱ्यांच्या बेपत्ता झाल्यामुळे पाकिस्तान सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अधिकाऱ्यांचा शोध सुरु होता. परंतु जर अटकेसंदर्भात कोणत्याही घटनेसाठी पहिल्यांदा राजदूताला कळवणं गरजेचे आहे असा नियम आहे.

 

स्वतंत्र देशांमधील राजनैतिक संबंधांवर १९६१ मध्ये व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी झाली. या कराराअंतर्गत मुत्सद्दी लोकांना विशेष अधिकार दिले जातात. या कराराच्या दोन वर्षांनंतर १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाने तयार केलेल्या एका तरतूदीचा समावेश केला. याला कन्सुलर रिलेशन ऑन व्हिएन्ना कन्व्हेन्शन म्हणतात. हा करार १९६४ मध्ये लागू झाला होता.

या कराराअंतर्गत यजमान देश त्यांच्या इथे राहणाऱ्या इतर देशांच्या मुत्सद्दी लोकांना विशेष दर्जा देतो. कोणताही देश कायदेशीर प्रकरणात दुसर्‍या देशाच्या मुत्सद्दीला अटक करू शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोठडीत ठेवता येत नाही. त्याच वेळी, यजमान देशातील मुत्सद्दीवर कोणताही कस्टम टॅक्स लावला जाऊ शकत नाही. त्याच कराराच्या कलम ३१ नुसार यजमान देशाचे पोलीस इतर देशांच्या दूतावास कार्यालयात जाऊ शकत नाहीत. पण त्या दूतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी यजमान देशाने उचलायलाच हवी. या कराराच्या अनुच्छेद ३६ नुसार एखादा देश परदेशी नागरिकाला अटक करतो तर संबंधित देशातील दूतावासाला त्वरित त्यास कळवावे लागते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान