शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

…म्हणून 'त्यांना' पोलिसांनी अटक केली; पाकमधील दोन भारतीय अधिकारी गायब प्रकरणाला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:52 IST

जियो टीव्हीच्या रिपोर्टनुसार दूतावास कार्यालयाबाहेरील रस्त्यावर भारतीय उच्चायुक्ताच्या बीएमडब्ल्यू कारने एका पाकिस्तानी नागरिकाला धडक दिली.

इस्लामाबाद – एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात लढाई करत आहे तर दुसरीकडे आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानभारताविरोधात षडयंत्र रचत आहे. भारतात दहशतवादी कारवायांना यश येत नसल्याने पाकच्या गुप्तचर यंत्रणेने आता आयएसआय इस्लामाबादमध्ये तैनात भारतीय दूतावासांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी इस्लामाबादमध्ये तैनात दोन भारतीय अधिकारी गायब झाल्याचा बातमी मिळाली. त्यानंतर आता पाकिस्तानी मीडियाने असा दावा केला आहे की, इस्लामाबाद पोलिसांनी या दोघांना हिट एन्ड रन प्रकरणात अटक केली आहे.

जियो टीव्हीच्या रिपोर्टनुसार दूतावास कार्यालयाबाहेरील रस्त्यावर भारतीय उच्चायुक्ताच्या बीएमडब्ल्यू कारने एका पाकिस्तानी नागरिकाला धडक दिली. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. इस्लामाबाद पोलिसांनी आंतरराष्ट्रीय नियमांच्या अंतर्गत या भारतीय उच्चायुक्तांना अटक केली आहे. डिप्लोमॅटिक कायदानुसार कोणताही देश दुसऱ्या देशातील राजदूताला अटक करु शकत नाही.

इंग्रजी वाहिनी टाईम्स नाऊच्या सूत्रांनुसार ही माहिती मिळाली आहे की, हे दोघं अधिकारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे आहेत, सकाळी ८.३० वाजता ते ड्रायव्हरच्या ड्यूटीसाठी बाहेर आले होते, भारताने अधिकाऱ्यांच्या बेपत्ता झाल्यामुळे पाकिस्तान सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अधिकाऱ्यांचा शोध सुरु होता. परंतु जर अटकेसंदर्भात कोणत्याही घटनेसाठी पहिल्यांदा राजदूताला कळवणं गरजेचे आहे असा नियम आहे.

 

स्वतंत्र देशांमधील राजनैतिक संबंधांवर १९६१ मध्ये व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी झाली. या कराराअंतर्गत मुत्सद्दी लोकांना विशेष अधिकार दिले जातात. या कराराच्या दोन वर्षांनंतर १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाने तयार केलेल्या एका तरतूदीचा समावेश केला. याला कन्सुलर रिलेशन ऑन व्हिएन्ना कन्व्हेन्शन म्हणतात. हा करार १९६४ मध्ये लागू झाला होता.

या कराराअंतर्गत यजमान देश त्यांच्या इथे राहणाऱ्या इतर देशांच्या मुत्सद्दी लोकांना विशेष दर्जा देतो. कोणताही देश कायदेशीर प्रकरणात दुसर्‍या देशाच्या मुत्सद्दीला अटक करू शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोठडीत ठेवता येत नाही. त्याच वेळी, यजमान देशातील मुत्सद्दीवर कोणताही कस्टम टॅक्स लावला जाऊ शकत नाही. त्याच कराराच्या कलम ३१ नुसार यजमान देशाचे पोलीस इतर देशांच्या दूतावास कार्यालयात जाऊ शकत नाहीत. पण त्या दूतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी यजमान देशाने उचलायलाच हवी. या कराराच्या अनुच्छेद ३६ नुसार एखादा देश परदेशी नागरिकाला अटक करतो तर संबंधित देशातील दूतावासाला त्वरित त्यास कळवावे लागते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान