शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:30 IST

गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे.

ठळक मुद्देआयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहेपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होतेभारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांचा दावा

इस्लमाबाद - गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. यासोबतच बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग निवडणूक लढण्यासाठी स्वतंत्र आहे असंही पाकिस्तान लष्कराने स्पष्ट केलं आहे.

मिल्ली मुस्लिम लीगला मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिला असून गेल्या महिन्यात पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मिल्ली मुस्लिम लीग राजकीय पक्ष असल्याचं अमान्य करत निवडणूक लढण्याची परवानगी दिली नव्हती. 

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. अमेरिकेच्या संसदेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधातील जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असून त्यांचे परराष्ट्र धोरण आहे. ते पाकिस्तान सरकारला जुमानत नाहीत असे स्पष्ट केले होते. 

अमेरिकेच्या दाव्यासंबंधी आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, 'संबंध असणे आणि पाठिंबा असणे यामध्ये फरक आहे. दहशतवाद्यांशी संबंध नसलेल्या एका गुप्तचर यंत्रणेचं नाव सांगा. संबंध सकारात्मकदेखील असू शकतात, आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी कुठेही पाठिंबा असल्याचा उल्लेख केलेला नाही'. 

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानची पुर्वेकडील सीमारेषा असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हा आकडा आतापर्यंत झालेल्या कोणत्याही वर्षातील उच्चांक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. 'पण आम्ही दिलेल्या उत्तरामुळे भारतालाही किंमत चुकवावी लागली आहे. पण जर भारत संयमाने वागला नाही तर आम्ही उत्तर देत राहू', असा इशारा त्यांनी दिला आहे. 

'आम्ही शांतताप्रिय देश असून आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. पण आम्ही आमचं रक्षण करु शकतो आणि त्यासाठी सक्षम आहोत', असं आसिफ गफूर बोलले आहेत. 'युद्ध हा पर्याय नसून ते होऊ नये यासाठी आम्ही सर्व पाय-यांवर चर्चा करत आहोत', असं आसिफ गफूर यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद