शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:30 IST

गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे.

ठळक मुद्देआयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहेपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होतेभारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांचा दावा

इस्लमाबाद - गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. यासोबतच बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग निवडणूक लढण्यासाठी स्वतंत्र आहे असंही पाकिस्तान लष्कराने स्पष्ट केलं आहे.

मिल्ली मुस्लिम लीगला मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिला असून गेल्या महिन्यात पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मिल्ली मुस्लिम लीग राजकीय पक्ष असल्याचं अमान्य करत निवडणूक लढण्याची परवानगी दिली नव्हती. 

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. अमेरिकेच्या संसदेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधातील जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असून त्यांचे परराष्ट्र धोरण आहे. ते पाकिस्तान सरकारला जुमानत नाहीत असे स्पष्ट केले होते. 

अमेरिकेच्या दाव्यासंबंधी आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, 'संबंध असणे आणि पाठिंबा असणे यामध्ये फरक आहे. दहशतवाद्यांशी संबंध नसलेल्या एका गुप्तचर यंत्रणेचं नाव सांगा. संबंध सकारात्मकदेखील असू शकतात, आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी कुठेही पाठिंबा असल्याचा उल्लेख केलेला नाही'. 

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानची पुर्वेकडील सीमारेषा असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हा आकडा आतापर्यंत झालेल्या कोणत्याही वर्षातील उच्चांक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. 'पण आम्ही दिलेल्या उत्तरामुळे भारतालाही किंमत चुकवावी लागली आहे. पण जर भारत संयमाने वागला नाही तर आम्ही उत्तर देत राहू', असा इशारा त्यांनी दिला आहे. 

'आम्ही शांतताप्रिय देश असून आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. पण आम्ही आमचं रक्षण करु शकतो आणि त्यासाठी सक्षम आहोत', असं आसिफ गफूर बोलले आहेत. 'युद्ध हा पर्याय नसून ते होऊ नये यासाठी आम्ही सर्व पाय-यांवर चर्चा करत आहोत', असं आसिफ गफूर यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद