शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी म्हणतात भारत "अत्याचारी हुकूमशाह"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 15:37 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 27 - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी म्हटलं आहे की, ""मुस्लिम देशांनी बहारिन, काश्मीर, यमनसारख्या ठिकाणांना खुलं समर्थन दिलं पाहिजे. तसंच रमजानमध्ये हल्ला करणा-या शोषक आणि हुकूमशहांविरोधात आवाज उठवला पाहिजे"". भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत अयातुल्ला खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिम देशांचा मुद्दा उपस्थित करणं, तसंत अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणं भारताला आवडलेलं नाही. भारताकडून या वक्तव्याचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 
 
ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या सर्वांचा एकच शत्रू असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. अयातुल्ला खोमेनी यांनी सौदी अबर, सुन्नी अरब आणि भारताला एकाच पंक्तीत आणून बसवलं आहे. 
 
काश्मीरमध्ये सध्या वातावरण चिघळलं असून याचवेळी अयातुल्ला खोमेनी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण अजून चिघळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
अयातुल्ला खोमेनी यांचा काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिमांचं लक्ष भारताकडे खेचण्याचा उद्देश असू शकतो. भारत आणि इराणमध्ये नेहमी मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. मात्र इराणचा भारताच्या बाबतीत नेहमीच संमिश्र दृष्टीकोन राहिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये इराण तटस्थ राहिला आहे, तर अनेक वेळा त्यांनी भारतविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
काश्मीरचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारणं असण्याची शक्यता म्हणजे भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध. दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध चांगले होत असल्याने इराणने काश्मीरचा विषय काढला असण्याची शक्यता आहे. भारताचा सौदीकडे होत असलेला कल इराणच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला दिल्ली आणि तेहरानदरम्यान सर्व काही आलबेल नाही. एका गॅस फिल्डवरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. त्यातच इराणमध्ये सुरु असलेल्या भारतातील काही मोठ्या प्रकल्पांवरील कामाची गती कमी झाली आहे.