शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी म्हणतात भारत "अत्याचारी हुकूमशाह"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 15:37 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 27 - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी म्हटलं आहे की, ""मुस्लिम देशांनी बहारिन, काश्मीर, यमनसारख्या ठिकाणांना खुलं समर्थन दिलं पाहिजे. तसंच रमजानमध्ये हल्ला करणा-या शोषक आणि हुकूमशहांविरोधात आवाज उठवला पाहिजे"". भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत अयातुल्ला खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिम देशांचा मुद्दा उपस्थित करणं, तसंत अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणं भारताला आवडलेलं नाही. भारताकडून या वक्तव्याचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 
 
ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या सर्वांचा एकच शत्रू असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. अयातुल्ला खोमेनी यांनी सौदी अबर, सुन्नी अरब आणि भारताला एकाच पंक्तीत आणून बसवलं आहे. 
 
काश्मीरमध्ये सध्या वातावरण चिघळलं असून याचवेळी अयातुल्ला खोमेनी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण अजून चिघळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
अयातुल्ला खोमेनी यांचा काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिमांचं लक्ष भारताकडे खेचण्याचा उद्देश असू शकतो. भारत आणि इराणमध्ये नेहमी मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. मात्र इराणचा भारताच्या बाबतीत नेहमीच संमिश्र दृष्टीकोन राहिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये इराण तटस्थ राहिला आहे, तर अनेक वेळा त्यांनी भारतविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
काश्मीरचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारणं असण्याची शक्यता म्हणजे भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध. दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध चांगले होत असल्याने इराणने काश्मीरचा विषय काढला असण्याची शक्यता आहे. भारताचा सौदीकडे होत असलेला कल इराणच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला दिल्ली आणि तेहरानदरम्यान सर्व काही आलबेल नाही. एका गॅस फिल्डवरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. त्यातच इराणमध्ये सुरु असलेल्या भारतातील काही मोठ्या प्रकल्पांवरील कामाची गती कमी झाली आहे.