शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी म्हणतात भारत "अत्याचारी हुकूमशाह"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 15:37 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 27 - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी म्हटलं आहे की, ""मुस्लिम देशांनी बहारिन, काश्मीर, यमनसारख्या ठिकाणांना खुलं समर्थन दिलं पाहिजे. तसंच रमजानमध्ये हल्ला करणा-या शोषक आणि हुकूमशहांविरोधात आवाज उठवला पाहिजे"". भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत अयातुल्ला खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिम देशांचा मुद्दा उपस्थित करणं, तसंत अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणं भारताला आवडलेलं नाही. भारताकडून या वक्तव्याचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 
 
ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या सर्वांचा एकच शत्रू असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. अयातुल्ला खोमेनी यांनी सौदी अबर, सुन्नी अरब आणि भारताला एकाच पंक्तीत आणून बसवलं आहे. 
 
काश्मीरमध्ये सध्या वातावरण चिघळलं असून याचवेळी अयातुल्ला खोमेनी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण अजून चिघळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
अयातुल्ला खोमेनी यांचा काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिमांचं लक्ष भारताकडे खेचण्याचा उद्देश असू शकतो. भारत आणि इराणमध्ये नेहमी मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. मात्र इराणचा भारताच्या बाबतीत नेहमीच संमिश्र दृष्टीकोन राहिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये इराण तटस्थ राहिला आहे, तर अनेक वेळा त्यांनी भारतविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
काश्मीरचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारणं असण्याची शक्यता म्हणजे भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध. दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध चांगले होत असल्याने इराणने काश्मीरचा विषय काढला असण्याची शक्यता आहे. भारताचा सौदीकडे होत असलेला कल इराणच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला दिल्ली आणि तेहरानदरम्यान सर्व काही आलबेल नाही. एका गॅस फिल्डवरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. त्यातच इराणमध्ये सुरु असलेल्या भारतातील काही मोठ्या प्रकल्पांवरील कामाची गती कमी झाली आहे.