शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

"भारताच्या सांगण्यावरून इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ला केला"; नजम सेठी यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 09:40 IST

इराणचा प्रतिहल्ला हा भारतासाठी इशारा असल्याचेही ते म्हणाले

Pakistan vs India - Iran: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय नजम सेठी यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत विचित्र दावा केला आहे. भारताच्या सांगण्यावरून इराणनेपाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते, असे त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले. भारताला इशारा देण्यासाठीच पाकिस्तानने इराणवर प्रत्युत्तराचा हल्ला केल्याचा दावाही त्यांनी केला. पण भविष्यासाठी कोणताही धोरणात्मक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून इराणशी पाकिस्तान हातमिळवणी करत असल्याचाही दावा नजम सेठी केला. सेठी यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ या विधानावरून नजम सेठी यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

काय म्हणाले नजम सेठी?

नजम सेठी यांनी न्यूज चॅनेलशी संवाद साधताना सांगितले की, "यामागे आमचा संशय आहे की इराण आणि भारत खूप जवळ आहेत. भारत आणि इराण यांच्यातील युतीचे दोन-तीन पैलू आहेत. त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले असावेत. भारताने त्यांना स्ट्राईकची कल्पना दिली असावी. पाकिस्तान प्रत्युत्तर देतो की नाही हे भारत तपासत आहे आणि पाकिस्तान प्रत्युत्तर देतो की नाही हे पाहण्यासाठी इराणकडून काम करून घेत आहे. त्यामुळे इराण आपल्या भावासारखा असूनही पाकिस्तानने अचूक उत्तर दिले आहे आणि ते तिथेच थांबवले, जेणेकरून ही गोष्ट पुढे जाऊ नये आणि भारताला योग्य तो संदेश मिळाला"

इराण भाऊ तर भारतला शत्रू!

नजम सेठी पुढे म्हणाले, "आमच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईने इराणला संदेश दिला नाही, तर तो भारताला संदेश आणि इशारा होता." यावर न्यूज अँकर म्हणाला आणि अफगाणिस्तानलाही प्रत्युत्तर दिले. यावर नजम सेठी म्हणाले, "हे बघा, अफगाणिस्तान नाही, कारण ते आमच्यावर क्षेपणास्त्रे डागत नाहीत. मुख्यतः हा भारतासाठी संदेश होता. हा एक प्रकारचा संदेश आहे. भारत आणि इराणच्या निवडणुकीपूर्वी त्यांना हा संदेश मिळणे गरजेचे होते. त्यांना शोषण करायचे आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही. पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर सर्वांसाठीच एक इशारा आहे," असे नजम सेठी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराणIndiaभारत