India Statement on Israel US Iran War: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर इराणने केलेल्या प्रत्युत्तरामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. दोन्ही बाजू सातत्याने हल्ले करत आहेत. इराण मध्य पूर्वेतील इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, भारताने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे!
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराण आणि आखातातील देशांमध्ये अलिकडच्या घडामोडींमुळे भारत खूप चिंताग्रस्त आहे. आम्ही सर्व देशांना संयम बाळगण्याचे, वाढता तणाव टाळण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. तणाव कमी करण्यासाठी आणि अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजकीय चर्चा व कुटनीतिचा अवलंब केला पाहिजे, असेही आवाहन केले आहे. भारताने पुढे म्हटले आहे की, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. आम्ही या प्रदेशातील आमच्या नागरिकांच्या संपर्कात आहोत आणि आमच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, दूतावासाशी संपर्कात राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे सल्ले दिले आहेत.
दोन्ही बाजूंकडून सतत हल्ले
इराण, इस्रायल आणि अमेरिकेकडून सतत हल्ले होत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, इराणवरील हल्ल्यांमुळे इराणी लोकांना त्यांचे भविष्य स्वतःच्या हातात घेण्याची संधी मिळेल. इराणचे क्रूर सरकार गेल्या ४७ वर्षांपासून इस्रायल आणि अमेरिकेच्या विध्वंसाची इच्छा करत आहे. ते म्हणाले, "अयातुल्ला सरकारने आपल्या नागरिकांवर अत्याचार केले आहेत. त्यांनी या प्रदेशातील लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. त्यांनी जगभरात दहशतीचे एक मोठे जाळे पसरवले आहे. त्यांनी अणुबॉम्ब आणि हजारो क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी संसाधने समर्पित केली आहेत. त्यांचे ध्येय इस्रायलला पृथ्वीवरून पुसून टाकणे आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही."
Web Summary : India expresses concern over escalating Iran-Israel tensions. Urges restraint, dialogue, and prioritizing citizen safety. Respect for sovereignty and territorial integrity emphasized. Indian citizens advised to remain vigilant.
Web Summary : भारत ने ईरान-इज़राइल तनाव बढ़ने पर चिंता व्यक्त की। संयम, बातचीत और नागरिक सुरक्षा को प्राथमिकता देने का आग्रह किया। संप्रभुता और क्षेत्रीय अखंडता का सम्मान महत्वपूर्ण है। भारतीय नागरिकों को सतर्क रहने की सलाह दी।