शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 10:23 IST

दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली."

इंडोनेशियामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना तेथील स्थानिक लोकांनी बोटीतून खालीही उतरू दिले नाही. लाकडाच्या बोटीतून आलेले 140 रोहिंग्या मुस्लीम इंडोनेशियाच्या उत्तरेकडील प्रांत आचेच्या किनाऱ्यापासून साधारणपणे 1 मैल (0.60 किलोमीटर) दूर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यात अधिकांश महिला आणि मुलांचा समावेश होता. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील कॉक्स बाजारातून दक्षिण आचे जिल्ह्यातील लाबुहान हाजीच्या किनाऱ्यापर्यंत जवळपास दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान तीन रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी 11 रोहिंग्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल  केले आहे.

"आम्हाला येथे शांतता हवी आहे" -दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली." याशिवाय, बंदरावर लटकलेल्या एका मोठ्या बॅनरवर लिहिले होते की, “या प्रदेशात रोहिंग्या निर्वासितांच्या आगमनाला दक्षिण आचे रीजेंसीच्या लोकांचा विरोध आहे."

आचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिमांचा हा समूह 9 ऑक्टोबरला कॉक्स बाजारातून रवाना झाला होता. त्यांना  मलेशियात जायचे होते. जबल यांनी म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांनी रोहिंग्या समूहाला भोजन दिले. याशिवाय, या निर्वासितांना संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनीही भोजन उपलब्ध करून दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट बांगलादेशातून निघाली तेव्हा तिच्यावर 216 लोक होते. यांपैकी 50 लोक इंडोनेशियातील रियाउ प्रांतात उतरले होते. यातच, आचे पोलिसांनी कथितपणे लोकांच्या तस्करीसंदर्भात तीन संशयितांना अटक केली आहे. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याIndonesiaइंडोनेशियाPoliceपोलिस